शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

गंगा नदीच्या पात्रात मृतदेह वाहिले; भाजपचा ढाेंगी चेहरा उघडा पडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST

स्थानिक स्वराज्य भवनमध्ये जिल्हा व महानगर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात, महिला व बाल कल्याण मंत्री यशाेमती ठाकूर ...

स्थानिक स्वराज्य भवनमध्ये जिल्हा व महानगर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात, महिला व बाल कल्याण मंत्री यशाेमती ठाकूर यांच्या सत्काराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी मंत्री थाेरात यांनी त्यांच्या खास शैलीत विराेधी पक्ष भाजपचा खरपूस समाचार घेतला. राज्यात महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरळीत सुरू असल्याने विराेधकांची पाेटदुखी वाढली आहे. सत्तेच्या हव्यासाने पछाडलेल्या विराेधकांकडून आघाडी सरकारला धाेका असल्याच्या वावड्या उठविल्या जातात. त्यामध्ये कवडीचेही तथ्य नसल्याचे महसूलमंत्री थाेरात यांनी सांगितले. आघाडी सरकारचे शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचे धाेरण आहे. तीनही पक्षांनी समाजवादी तत्त्वज्ञानाचा स्वीकार केल्यामुळेच आघाडीत काेणतेही भेदभाव नाहीत. पुराच्या संकटात दिलासा देण्यासाठी सरकारने साडेअकराशे काेटींची मदत दिली असून, त्यापूर्वीही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याचे महसूलमंत्री थाेरात यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, पक्ष निरीक्षक झिया पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, अनंतराव बगाडे, चंद्रकांत सावजी, साजिद खान पठाण, प्रा. संजय बोडखे, हेमंत देशमुख, रमाकांत खेतान, मदन भरगड, प्रकाश तायडे, प्रदीप वखारिया, मोहम्मद बदरूजमा, निखिलेश दिवेकर, सुधीर ढोणे, डॉ. संजीवनी बिहाडे, महेश गनगने, आदी उपस्थित हाेते. यावेळी माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी यांनी विचार व्यक्त केले. संचालन कपिल रावदेव यांनी केले.

मुख्यमंत्र्यांना पसंती म्हणजे आघाडीला पसंती!

उद्धव ठाकरे देशातील सर्वाधिक पसंतीचे मुख्यमंत्री ठरत आहेत. त्यांना पसंती म्हणजेच जनतेची महाविकास आघाडी सरकारला पसंती असल्याचे बाळासाहेब थाेरात म्हणाले. यापूर्वी राज्यात फडणवीस नव्हे, तर फसणवीस सरकार हाेते. केंद्र सरकार लोकशाही मोडीत काढण्याचे पाप करीत असून, देश एकसंध ठेवण्यासाठी काँग्रेसला बळ द्या, आपसांतील मतभेद मिटवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

संघटनेची ताकद मतपेटीत दाखवा!

पक्षाच्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसते. संघटना मजबूत करताना नेमकं चुकते कुठे, यावरही चिंतन केले पाहिजे. संघटनेची ताकद आगामी मनपा निवडणुकीच्या मतपेटीत दाखवा, असे आवाहन बाळासाहेब थाेरात यांनी केले.