शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वस्तुस्थितीची माहिती मागितल्याने खवळले पित्त

By admin | Updated: March 16, 2017 02:42 IST

गोदामातील संपूर्ण तुरीची एफएक्यू तपासणी करण्याची प्रकाश मानकर यांची मागणी.

अकोला, दि. १५-नाफेडच्या वतीने एजंट म्हणून मार्के टिंग फेडरेशन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तूर खरेदीतील वस्तुस्थितीची माहिती मागितल्याने संबंधितांचे चांगलेच पित्त खवळले आहे. त्यापासून परावृत्त करण्यासाठीच फौजदारी तक्रार दुसर्‍या दिवशी करण्यात आली. या दबावाचा काहीच फरक पडणार नाही. आता शासनाने खरेदी केलेल्या गोदामातील संपूर्ण तुरीची एफएक्यू तपासणी करण्याची मागणी लावून धरू, असे भारत कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या वर्षी बाजारात तुरीला आठ ते दहा हजार रुपये भाव होते. यावर्षी ते ३५00 रुपयांपर्यंंंत खाली आले. शेतकर्‍यांची लूट सुरू असताना शासनाने हमीभावाने तूर खरेदी सुरू केली. त्यातही खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची तूर मागे ठेवत व्यापार्‍यांचीच तूर प्राधान्याने घेण्याचा सपाटा खरेदी केंद्रावर सुरू करण्यात आला. सोबतच शेतकर्‍यांची तूर २0-२0 दिवस केंद्रावर ठेवण्यात आली. त्यातून शेतकर्‍यांना चांगलाच आर्थिक फटका बसत होता. त्यानंतरही तूर गुणवत्तेची नाही, या कारणाने वाहने परत करण्याचा उद्दामपणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रावर सुरू होता. याबाबतची माहिती शेतकर्‍यांनी दिल्यामुळे तूर खरेदी केंद्रावर धाव घेतली, त्यावेळी खरेदी बंद होती. केंद्रावर जाताच जिल्हा मार्के टिंग अधिकारी वाजपेयी यांनी दुपारी १२.३0 वाजतानंतर खरेदी सुरू केली. त्याचवेळी वाजपेयी यांना शेतकर्‍यांना परत का पाठविता, अशी विचारणा केली. त्यांनी गुणवत्तेचा मुद्दा मांडला. त्यावर गोदामात खरेदी केलेली सर्वच तूर एफएक्यू दर्जाची आहे का, याबाबतही गोलमाल उत्तर त्यांनी दिले. त्या दिवशी शेतकर्‍यांना समजावून प्रकरण शांत केले; मात्र दुसर्‍या दिवशी सायंकाळी कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार वाजपेयी यांनी केली. हा प्रकार शेतकर्‍यांची मुस्कटदाबी करण्यासाठी केल्याचेही मानकर म्हणाले. उशिराने तक्रारीमागे वेगळेच कारणमार्के टिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांनी एक दिवस उशिराने तक्रार केली. हा प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती व्यापार्‍यांनी तूर खरेदी केली, त्यांनी कोणत्या भावाने, कोठे विकली, याबाबतची माहिती मागितली. तसेच तूर विक्री करणार्‍या शेतकरी याद्या, त्यांनी विक्री केलेली तूर यासंदर्भातील माहितीही मागितली. त्याचा अर्ज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनाही दिला. त्यानंतर सायंकाळीच गुन्हे दाखल झाल्याने यामागे कुटिल डाव असल्याचा आरोपही मानकर यांनी केला. यावेळी कृषक समाजाचे कार्याध्यक्ष राजकुमार भट्टड, शेषराव पाटील व गोविंद पाटील उपस्थित होते.