शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

वस्तुस्थितीची माहिती मागितल्याने खवळले पित्त

By admin | Updated: March 16, 2017 02:42 IST

गोदामातील संपूर्ण तुरीची एफएक्यू तपासणी करण्याची प्रकाश मानकर यांची मागणी.

अकोला, दि. १५-नाफेडच्या वतीने एजंट म्हणून मार्के टिंग फेडरेशन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तूर खरेदीतील वस्तुस्थितीची माहिती मागितल्याने संबंधितांचे चांगलेच पित्त खवळले आहे. त्यापासून परावृत्त करण्यासाठीच फौजदारी तक्रार दुसर्‍या दिवशी करण्यात आली. या दबावाचा काहीच फरक पडणार नाही. आता शासनाने खरेदी केलेल्या गोदामातील संपूर्ण तुरीची एफएक्यू तपासणी करण्याची मागणी लावून धरू, असे भारत कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या वर्षी बाजारात तुरीला आठ ते दहा हजार रुपये भाव होते. यावर्षी ते ३५00 रुपयांपर्यंंंत खाली आले. शेतकर्‍यांची लूट सुरू असताना शासनाने हमीभावाने तूर खरेदी सुरू केली. त्यातही खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची तूर मागे ठेवत व्यापार्‍यांचीच तूर प्राधान्याने घेण्याचा सपाटा खरेदी केंद्रावर सुरू करण्यात आला. सोबतच शेतकर्‍यांची तूर २0-२0 दिवस केंद्रावर ठेवण्यात आली. त्यातून शेतकर्‍यांना चांगलाच आर्थिक फटका बसत होता. त्यानंतरही तूर गुणवत्तेची नाही, या कारणाने वाहने परत करण्याचा उद्दामपणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रावर सुरू होता. याबाबतची माहिती शेतकर्‍यांनी दिल्यामुळे तूर खरेदी केंद्रावर धाव घेतली, त्यावेळी खरेदी बंद होती. केंद्रावर जाताच जिल्हा मार्के टिंग अधिकारी वाजपेयी यांनी दुपारी १२.३0 वाजतानंतर खरेदी सुरू केली. त्याचवेळी वाजपेयी यांना शेतकर्‍यांना परत का पाठविता, अशी विचारणा केली. त्यांनी गुणवत्तेचा मुद्दा मांडला. त्यावर गोदामात खरेदी केलेली सर्वच तूर एफएक्यू दर्जाची आहे का, याबाबतही गोलमाल उत्तर त्यांनी दिले. त्या दिवशी शेतकर्‍यांना समजावून प्रकरण शांत केले; मात्र दुसर्‍या दिवशी सायंकाळी कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार वाजपेयी यांनी केली. हा प्रकार शेतकर्‍यांची मुस्कटदाबी करण्यासाठी केल्याचेही मानकर म्हणाले. उशिराने तक्रारीमागे वेगळेच कारणमार्के टिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांनी एक दिवस उशिराने तक्रार केली. हा प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती व्यापार्‍यांनी तूर खरेदी केली, त्यांनी कोणत्या भावाने, कोठे विकली, याबाबतची माहिती मागितली. तसेच तूर विक्री करणार्‍या शेतकरी याद्या, त्यांनी विक्री केलेली तूर यासंदर्भातील माहितीही मागितली. त्याचा अर्ज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनाही दिला. त्यानंतर सायंकाळीच गुन्हे दाखल झाल्याने यामागे कुटिल डाव असल्याचा आरोपही मानकर यांनी केला. यावेळी कृषक समाजाचे कार्याध्यक्ष राजकुमार भट्टड, शेषराव पाटील व गोविंद पाटील उपस्थित होते.