शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

बालकल्याण योजनेतील सेवानवृत्तांच्या जीवनात अंधकार

By admin | Updated: February 25, 2016 01:34 IST

जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर, सहा महिन्यांपासून नवृत्ती वेतनच नाही.

शिखरचंद बागरेचा/वाशिममहाराष्ट्र राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड अंतर्गत असलेल्या कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानवृत्त कर्मचार्‍यांना मागील सहा महिन्यांपासून नवृत्ती वेतन न मिळाल्यामुळे जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कुटुंब बालकल्याण योजनेतील सर्व सेवानवृत्तांचे जीवन अंधकारमय झाले आहे.राज्यभरातील सुमारे वीस लाख कर्मचारी व नवृत्ती वेतनधारक शासकीय अनुदानाच्या माध्यमातून पाचवा व सहाव्या वेतनाचा पुरेपूर लाभ घेत असून, सातव्या वेतनाच्या प्रतीक्षेत आहे; मात्र शासकीय योजनेत प्रामाणिकपणे दीर्घ सेवा देणार्‍या कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानवृत्त कर्मचार्‍यांना त्यांच्या न्याय्य हक्कापासून शासन वंचितच ठेवत आहे. तसेच पाचवा, सहावा व सातवा वेतन तर सोडाच सहा महिने उलटले तरीही त्यांना अद्याप नवृत्ती वेतन अदा करण्यात आले नाही. त्यामुळे केवळ ३00 ते ३५0 च्या संख्येत असलेल्या या नवृत्त कर्मचार्‍यांवर उपासमारीची पाळी आली आहे. अनेक जण उपासमारीचे बळी ठरून मृत्युमुखी पडले आहेत. यावरून राज्यसरकार, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या संवेदना बोथट झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र समाज कल्याण बोर्ड अंतर्गत संपूर्ण राज्यात ३६ कुटुंब व बालकल्याण योजना राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली कार्यरत होत्या. या कार्यालयातील केवळ ३00 कर्मचारी सेवानवृत्त आहेत. ७0 ते ८५ वष्रे वयोगटातील या कर्मचार्‍यांमध्ये ९0 टक्के महिला भगिनींची संख्या आहे. कुटुंब व बालकल्याण योजनेत त्याकाळी तुटपुंज्या वेतनावर काम करून केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागात प्रामाणिकपणे व प्रभावीपणे राबवित होत्या. या कर्मचार्‍यांना शासनाने पाचवा वेतन तब्बल १२ वष्रे उशिराने तर सहावा वेतन सहा वष्रे उशिराने लागू करून आपला दुटप्पीपणा दाखवून दिला. शासनाच्या या धोरणामुळे सातवा वेतन आयोग लागू होईल की नाही, याबाबत नवृत्त कर्मचारी साशंक आहेत. शासनाचे गलेलठ्ठ वेतन घेणारे शासकीय कर्मचारी, तसेच मोठय़ा प्रमाणात मानधन घेणारे मंत्री महोदय व आमदार या लोकप्रतिनिधींना कधी पाझर फुटेल, अशी आशा कुटुंब बालकल्याण योजनेचे सेवानवृत्त कर्मचारी बाळगून आहेत.