शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
5
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
6
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
7
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
8
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
9
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
11
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
12
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
13
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
14
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
15
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
16
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
17
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
18
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
19
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार गावांच्या दुष्काळमुक्तीसाठी ‘बीजेएस’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:28 IST

अकोला : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेंव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान पूर्ण करणाऱ्या तीन हजार गावांना भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी व पोकलेन सारख्या अद्ययावत मशीन पुरविल्या जाणार आहेत.

ठळक मुद्दे या वर्षी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.तीन हजार गावातील लोक श्रमदान करणार आहेत.या सर्व गावांत भारतीय जैन संघटना विनामूल्य जेसीबी आणि पोकलेन पुरविणार आहे.

अकोला : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेंव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान पूर्ण करणाऱ्या तीन हजार गावांना भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी व पोकलेन सारख्या अद्ययावत मशीन पुरविल्या जाणार आहेत. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात येत असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया यांनी ओसवाल भवनातील पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे गावकºयांनी स्वत: या कार्यासाठी एकत्र यायचे, पाच लोकांना प्रशिक्षणाला पाठवायचे, आपल्या गावचा वॉटर शेड मॅनेजमेंट प्लॅन आपणच तयार करायचा व श्रमदानाने काम करून स्वावलंबी व्हायचे. गेल्या वर्षी ही स्पर्धा ३० तालुक्यांतील सर्व गावांमध्ये घेण्यात आली होती. या वर्षी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. ५९०० गावांनी या स्पर्धेत सहभागी होऊन प्रशिक्षण घेतले. यापैकी तीन हजार गावे तरी श्रमदानाचा टप्पा पूर्ण करतील. या तीन हजार गावातील लोक श्रमदान करणार आहेत. श्रमदानानंतर कठीण काम असणाºया गावातील काम नंतर मशीनद्वारे होणार आहे. खडक असलेल्या भागात जेसीबी किंवा पोकलेनद्वारेच काम करता येणार आहे. अशा ठिकाणी बीजेएसचा पुढाकार राहणार आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, पातूर, आणि बार्शीटाकळी या तालुक्यातील २३० गावे प्रशिक्षण घेऊन, या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. या सर्व गावांत भारतीय जैन संघटना विनामूल्य जेसीबी आणि पोकलेन पुरविणार आहे. जैन संघाने यासाठी पूर्णवेळ समन्वयक नेमले आहेत. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी संतोष पवार, आदीनाथ पवार, संदीप मस्के आणि सहदेव सुर्वे यांची नियुक्ती केली आहे. पत्रकार परिषदेला भारतीय जैन संघटनेचे शीतल खाबिया, नरेश चौधरी, शैलेंद्र पारख, अमरीश पारेख, समीप इंदेने, विजय चौधरी, प्रवीण कर्नावट, प्रशांत कोठारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. शांतीलाल मुथा २४ एप्रिल रोजी अकोल्यातभारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा पाणी फाउंडेशनच्या सभेसाठी मंगळवार, २४ एप्रिल रोजी अकोल्यात दुपारी ३.३० वाजता येणार आहेत. अकोला जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहितीदेखील येथे दिली गेली.

 

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा