शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा, अशी म्हणण्याची वेळ भाजपाने आणलीय - सुजात आंबेडकर

By atul.jaiswal | Updated: October 25, 2023 21:17 IST

अकोला  : २०१४ च्या  च्या निवडणुकीत 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी विचारणा भाजपाने केली होती.  आज याच भाजपाने ...

अकोला  : २०१४ च्या  च्या निवडणुकीत 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी विचारणा भाजपाने केली होती.  आज याच भाजपाने व राज्यातील मनुवाद्यांनी ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुधवारी येथे बोलताना केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार, २५ ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित करण्यात आलेला धम्म मेळाव्यात सुजात आंबेडकर बोलत होते.

या प्रसंगी  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड प्रकाश आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. दुपारी आंबेडकर यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मार्गाने निघालेली ही यात्रा अकोला क्रिकेट स्टेडियमवर येऊन तिचे जाहीर मेळाव्यात रूपांतर झाले, तेथे आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. सुजात आंबेडकर यांनी यावेळी बोलताना राज्यातील भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) सरकारवर टीकेची झोड उठवली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपाने नकली आंबेडकरवादी पुढे केल्याचे सांगून, त्यांच्यावर विश्वास न ठेवता निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले.

राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, दिल्लीतल्या नेत्याने नफरत की दुकान बंद करण्यासाठी प्रेमाची दुकान उघडली आहे, परंतु त्यांनी एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना आजमावून बघावे; भाजपाचा नफर चा बाजार उठवून दाखवू, असे सुजात आंबेडकर म्हणाले. देशातील संघ, भाजपच्या विचारधारेचा पराभव केवळ आंबेडकरवादी विचारधारच करू शकते. या विचारधारेला घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता नकली आंबेडकरवाद्यांना पे रोलवर ठेवले आहे. आपण सतर्क राहिलो नाही तर हे नकली आंबेडकरवादी आपल्या वस्त्यांमध्ये शिरून अपप्रचार करतील. असेच नकली आंबेडकरवादी आपल्या चळवळीत संभ्रम निर्माण करत असल्याचेही यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Akolaअकोला