शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वेगळा विदर्भ करण्याची क्षमता भाजपमध्येच!

By admin | Updated: March 15, 2016 02:30 IST

दोन-तीन वर्षात होईल वेगळा विदर्भ, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष दत्ता मेघे यांचा दावा.

अकोला: अनेक वर्षांपासून वेगळय़ा विदर्भाची मागणी होत आहे; परंतु अनेक राजकीय पक्षांचा त्याला विरोध आहे. केवळ भाजपनेच त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वेगळय़ा विदर्भाबाबत ठराव पारित केला होता. वेगळा विदर्भ निर्माण करण्याची ताकद केवळ भाजपातच असून, येत्या दोन ते तीन वर्षांंमध्ये विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकते, असे मत माजी खासदार व विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष दत्ता मेघे यांनी येथे व्यक्त केले. विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी माजी खासदार दत्ता मेघे हे सोमवारी अकोल्यात आले होते. यावेळी पत्रकारांसोबत त्यांनी चर्चा केली. वेगळय़ा विदर्भाची मागणी फार जुनी आहे. अनेकांनी वेगळय़ा विदर्भासाठी आंदोलन केले; परंतु त्याला यश मिळाले नाही. मीसुद्धा वेगळय़ा विदर्भ राज्याविषयी अनेकदा भूमिका मांडली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेस पक्षासोबतच शिवसेना, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही विदर्भ राज्य निर्माण करण्यास विरोध करीत आहे. विदर्भाच्या जनतेला स्वतंत्र राज्य हवे असेल, तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात दत्ता मेघे म्हणाले, की तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. हिंसाचार करण्यात आला. छत्तीसगड राज्यातील जनतेने मात्र वेगळय़ा राज्यासाठी कोणतेही आंदोलन केले नाही; तरीही छत्तीसगड राज्याची निर्मिती त्यावेळी करण्यात आली. विदर्भाच्या बाबतीत हेच तत्त्व लागू पडते. विदर्भातील जनता अहिंसावादी आहे. त्यामुळे येथील जनता विदर्भ राज्यासाठी तीव्र आंदोलन करताना दिसत नाही. याचा अर्थ असा होत नाही, की विदर्भाच्या जनतेला वेगळे राज्य नको आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा त्याची ध्येयधोरणे दृष्टीसमोर ठेवून काम करतो; परंतु भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भ राज्याच्या निर्मितीचा मुद्दा ठेवला होता आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत भाजपने वेगळय़ा विदर्भाचा ठराव पारितही केला. त्यामुळे वेगळय़ा विदर्भाची निर्मिती भाजपशिवाय दुसरा कोणताही पक्ष करू शकत नाही, असे स्पष्ट मत माजी खासदार दत्ता मेघे यांनी येथे मांडले. पत्रपरिषदेला माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी महापौर अश्‍विनी हातवळणे, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, विष्णू मेहरे, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय उजवणे, धनंजय नालट आदी उपस्थित होते. जनमत घेण्याची गरज येथील जनतेला विदर्भ राज्य नको आहे, असे कोणीही गृहित धरू नये. हिंसेच्या मार्गातून कधीही काही मिळत नाही. शांततेच्या मार्गानेच विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकते. केंद्र सरकारने विदर्भात जनमत चाचणी घ्यावी. जनतेने विदर्भाच्या बाजूने मतदान केले तर सरकारला विदर्भ राज्याची निर्मिती करावीच लागेल, असे माजी खासदार दत्ता मेघे यांनी सांगितले.