शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

वेगळा विदर्भ करण्याची क्षमता भाजपमध्येच!

By admin | Updated: March 15, 2016 02:30 IST

दोन-तीन वर्षात होईल वेगळा विदर्भ, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष दत्ता मेघे यांचा दावा.

अकोला: अनेक वर्षांपासून वेगळय़ा विदर्भाची मागणी होत आहे; परंतु अनेक राजकीय पक्षांचा त्याला विरोध आहे. केवळ भाजपनेच त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वेगळय़ा विदर्भाबाबत ठराव पारित केला होता. वेगळा विदर्भ निर्माण करण्याची ताकद केवळ भाजपातच असून, येत्या दोन ते तीन वर्षांंमध्ये विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकते, असे मत माजी खासदार व विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष दत्ता मेघे यांनी येथे व्यक्त केले. विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी माजी खासदार दत्ता मेघे हे सोमवारी अकोल्यात आले होते. यावेळी पत्रकारांसोबत त्यांनी चर्चा केली. वेगळय़ा विदर्भाची मागणी फार जुनी आहे. अनेकांनी वेगळय़ा विदर्भासाठी आंदोलन केले; परंतु त्याला यश मिळाले नाही. मीसुद्धा वेगळय़ा विदर्भ राज्याविषयी अनेकदा भूमिका मांडली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेस पक्षासोबतच शिवसेना, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही विदर्भ राज्य निर्माण करण्यास विरोध करीत आहे. विदर्भाच्या जनतेला स्वतंत्र राज्य हवे असेल, तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात दत्ता मेघे म्हणाले, की तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. हिंसाचार करण्यात आला. छत्तीसगड राज्यातील जनतेने मात्र वेगळय़ा राज्यासाठी कोणतेही आंदोलन केले नाही; तरीही छत्तीसगड राज्याची निर्मिती त्यावेळी करण्यात आली. विदर्भाच्या बाबतीत हेच तत्त्व लागू पडते. विदर्भातील जनता अहिंसावादी आहे. त्यामुळे येथील जनता विदर्भ राज्यासाठी तीव्र आंदोलन करताना दिसत नाही. याचा अर्थ असा होत नाही, की विदर्भाच्या जनतेला वेगळे राज्य नको आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा त्याची ध्येयधोरणे दृष्टीसमोर ठेवून काम करतो; परंतु भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भ राज्याच्या निर्मितीचा मुद्दा ठेवला होता आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत भाजपने वेगळय़ा विदर्भाचा ठराव पारितही केला. त्यामुळे वेगळय़ा विदर्भाची निर्मिती भाजपशिवाय दुसरा कोणताही पक्ष करू शकत नाही, असे स्पष्ट मत माजी खासदार दत्ता मेघे यांनी येथे मांडले. पत्रपरिषदेला माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी महापौर अश्‍विनी हातवळणे, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, विष्णू मेहरे, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय उजवणे, धनंजय नालट आदी उपस्थित होते. जनमत घेण्याची गरज येथील जनतेला विदर्भ राज्य नको आहे, असे कोणीही गृहित धरू नये. हिंसेच्या मार्गातून कधीही काही मिळत नाही. शांततेच्या मार्गानेच विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकते. केंद्र सरकारने विदर्भात जनमत चाचणी घ्यावी. जनतेने विदर्भाच्या बाजूने मतदान केले तर सरकारला विदर्भ राज्याची निर्मिती करावीच लागेल, असे माजी खासदार दत्ता मेघे यांनी सांगितले.