शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

वेगळा विदर्भ करण्याची क्षमता भाजपमध्येच!

By admin | Updated: March 15, 2016 02:30 IST

दोन-तीन वर्षात होईल वेगळा विदर्भ, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष दत्ता मेघे यांचा दावा.

अकोला: अनेक वर्षांपासून वेगळय़ा विदर्भाची मागणी होत आहे; परंतु अनेक राजकीय पक्षांचा त्याला विरोध आहे. केवळ भाजपनेच त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वेगळय़ा विदर्भाबाबत ठराव पारित केला होता. वेगळा विदर्भ निर्माण करण्याची ताकद केवळ भाजपातच असून, येत्या दोन ते तीन वर्षांंमध्ये विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकते, असे मत माजी खासदार व विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष दत्ता मेघे यांनी येथे व्यक्त केले. विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी माजी खासदार दत्ता मेघे हे सोमवारी अकोल्यात आले होते. यावेळी पत्रकारांसोबत त्यांनी चर्चा केली. वेगळय़ा विदर्भाची मागणी फार जुनी आहे. अनेकांनी वेगळय़ा विदर्भासाठी आंदोलन केले; परंतु त्याला यश मिळाले नाही. मीसुद्धा वेगळय़ा विदर्भ राज्याविषयी अनेकदा भूमिका मांडली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेस पक्षासोबतच शिवसेना, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही विदर्भ राज्य निर्माण करण्यास विरोध करीत आहे. विदर्भाच्या जनतेला स्वतंत्र राज्य हवे असेल, तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात दत्ता मेघे म्हणाले, की तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. हिंसाचार करण्यात आला. छत्तीसगड राज्यातील जनतेने मात्र वेगळय़ा राज्यासाठी कोणतेही आंदोलन केले नाही; तरीही छत्तीसगड राज्याची निर्मिती त्यावेळी करण्यात आली. विदर्भाच्या बाबतीत हेच तत्त्व लागू पडते. विदर्भातील जनता अहिंसावादी आहे. त्यामुळे येथील जनता विदर्भ राज्यासाठी तीव्र आंदोलन करताना दिसत नाही. याचा अर्थ असा होत नाही, की विदर्भाच्या जनतेला वेगळे राज्य नको आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा त्याची ध्येयधोरणे दृष्टीसमोर ठेवून काम करतो; परंतु भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भ राज्याच्या निर्मितीचा मुद्दा ठेवला होता आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत भाजपने वेगळय़ा विदर्भाचा ठराव पारितही केला. त्यामुळे वेगळय़ा विदर्भाची निर्मिती भाजपशिवाय दुसरा कोणताही पक्ष करू शकत नाही, असे स्पष्ट मत माजी खासदार दत्ता मेघे यांनी येथे मांडले. पत्रपरिषदेला माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी महापौर अश्‍विनी हातवळणे, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, विष्णू मेहरे, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय उजवणे, धनंजय नालट आदी उपस्थित होते. जनमत घेण्याची गरज येथील जनतेला विदर्भ राज्य नको आहे, असे कोणीही गृहित धरू नये. हिंसेच्या मार्गातून कधीही काही मिळत नाही. शांततेच्या मार्गानेच विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकते. केंद्र सरकारने विदर्भात जनमत चाचणी घ्यावी. जनतेने विदर्भाच्या बाजूने मतदान केले तर सरकारला विदर्भ राज्याची निर्मिती करावीच लागेल, असे माजी खासदार दत्ता मेघे यांनी सांगितले.