शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

गांधी चाैकात ऑटाेचालकांची मनमानी अकाेला : शहरातील ऑटाेचालकांना पाेलीस प्रशासनाचा कवडीचाही धाक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गांधी चाैकात ...

गांधी चाैकात ऑटाेचालकांची मनमानी

अकाेला : शहरातील ऑटाेचालकांना पाेलीस प्रशासनाचा कवडीचाही धाक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गांधी चाैकात पाेलिसांच्या नाकावर टिच्चून ऑटाेचालक प्रवाशांसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी वाहतुकीची काेंडी निर्माण हाेत असली तरी वाहतूक पाेलिसांकडून काेणतीही कारवाई केली जात नाही.

पाणीपुरवठा विस्कळीत

अकाेला : शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या महानजी प्लाॅटमधील जलकुंभाच्या मुख्य जलवाहिनीवर इतर जलवाहिनीच्या जाेडणीचे काम केले जात आहे. त्या आनुषंगाने पूर्व झाेनमधील काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारपासून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे.

खुले नाट्यगृह ते फतेह रस्त्यावर काेंडी

अकाेला : खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैकापर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत दाेन्ही बाजूने प्लॅस्टिक विक्रेत्यांसह फळविक्रेत्यांनी अतिक्रमण उभारले आहे. रस्त्यात साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आल्यामुळे या मार्गावरून धड चालणेही मुश्कील झाले आहे. रविवारी गर्दीमुळे या रस्त्यावर वाहतुकीची काेंडी झाल्याचे दिसून आले आहे.

बसस्थानकालगतचा खड्डा ठरताेय जीवघेणा

अकाेला : मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालगत रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी भला माेठा खड्डा खाेदण्यात आला आहे. याठिकाणी भूमिगत नालीचे बांधकाम केले जाणार हाेते. सदर काम अर्धवट असून, हा खड्डा कायम असल्यामुळे बसस्थानकात येणारे प्रवासी तसेच शहरातील वाहनचालकांच्या जिवाला धाेका निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद

अकाेला : शहरातील वाशिम बायपास चाैक ते बाळापुर नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुभाजकामधील एलइडी पथदिवे मागील चार महिन्यांपासून बंद पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण हाेत असले तरी बांधकाम झालेल्या रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अंधाराचे साम्राज्य आहे.

व्हाॅल्व्ह नादुरुस्त; पाण्याचा अपव्यय

अकाेला : रेल्वे स्टेशन चाैकात महापालिकेचे दाेन जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभातून अकाेटफैल परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. अकाेटफैल भागातील उड्डाणपुलालगतच्या भागात व्हाॅल्व्ह नादुरुस्त झाल्याने याठिकाणी पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेत आहे. याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

जलकुंभ परिसरात साचले पाणी

अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आउटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक व जलप्रदाय विभाग पुढाकार घेईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.