शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

भाजपतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

गांधी चाैकात ऑटाेचालकांची मनमानी अकाेला : शहरातील ऑटाेचालकांना पाेलीस प्रशासनाचा कवडीचाही धाक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गांधी चाैकात ...

गांधी चाैकात ऑटाेचालकांची मनमानी

अकाेला : शहरातील ऑटाेचालकांना पाेलीस प्रशासनाचा कवडीचाही धाक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गांधी चाैकात पाेलिसांच्या नाकावर टिच्चून ऑटाेचालक प्रवाशांसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी वाहतुकीची काेंडी निर्माण हाेत असली तरी वाहतूक पाेलिसांकडून काेणतीही कारवाई केली जात नाही.

पाणीपुरवठा विस्कळीत

अकाेला : शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या महानजी प्लाॅटमधील जलकुंभाच्या मुख्य जलवाहिनीवर इतर जलवाहिनीच्या जाेडणीचे काम केले जात आहे. त्या आनुषंगाने पूर्व झाेनमधील काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारपासून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे.

खुले नाट्यगृह ते फतेह रस्त्यावर काेंडी

अकाेला : खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैकापर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत दाेन्ही बाजूने प्लॅस्टिक विक्रेत्यांसह फळविक्रेत्यांनी अतिक्रमण उभारले आहे. रस्त्यात साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आल्यामुळे या मार्गावरून धड चालणेही मुश्कील झाले आहे. रविवारी गर्दीमुळे या रस्त्यावर वाहतुकीची काेंडी झाल्याचे दिसून आले आहे.

बसस्थानकालगतचा खड्डा ठरताेय जीवघेणा

अकाेला : मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालगत रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी भला माेठा खड्डा खाेदण्यात आला आहे. याठिकाणी भूमिगत नालीचे बांधकाम केले जाणार हाेते. सदर काम अर्धवट असून, हा खड्डा कायम असल्यामुळे बसस्थानकात येणारे प्रवासी तसेच शहरातील वाहनचालकांच्या जिवाला धाेका निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद

अकाेला : शहरातील वाशिम बायपास चाैक ते बाळापुर नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुभाजकामधील एलइडी पथदिवे मागील चार महिन्यांपासून बंद पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण हाेत असले तरी बांधकाम झालेल्या रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अंधाराचे साम्राज्य आहे.

व्हाॅल्व्ह नादुरुस्त; पाण्याचा अपव्यय

अकाेला : रेल्वे स्टेशन चाैकात महापालिकेचे दाेन जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभातून अकाेटफैल परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. अकाेटफैल भागातील उड्डाणपुलालगतच्या भागात व्हाॅल्व्ह नादुरुस्त झाल्याने याठिकाणी पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेत आहे. याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

जलकुंभ परिसरात साचले पाणी

अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आउटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक व जलप्रदाय विभाग पुढाकार घेईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.