शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

गुंडांचे पुनर्वसन करणारं भाजपाचं सरकार - अशोक चव्हाण

By admin | Updated: February 11, 2017 18:22 IST

केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आलेले भाजपा सरकारमुळे गुंडांना चांगले दिवस आले. असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 11 -  केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आलेले भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील सरकार आहे. या सरकारमध्ये सामान्यांचे भले होत नाही, मात्र गुंडांना चांगले दिवस आलेत. असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.  
 
काँग्रेसच्या काळात सरकारमध्ये मदत व पुनर्वसन खाते होते, भाजपाच्या काळात हेच खाते गुंडांसाठी मदत व पुनर्वसन असे झाले असून, हे सरकार केवळ गुंडांचे पुनर्वसन करणारे सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. 
 
अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ स्थानिक स्वराज्य भवन मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री नसीम खान, डॉ. नितीन राऊत, आमदार भाई जगताप, महानगराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी आदी उपस्थित होते. 
 
या सरकारचे मंत्री गुंडांची स्तुती करतात. त्यांना आधी पक्षात घेऊ, निवडून आणू व मग सुधरवणार, अशी भाषा करतात. केवळ गुंडांचे पुनर्वसन हाच या सरकारचा अजेंडा असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. काँग्रेसच्या काळात ज्या योजना राबवल्या गेल्या, त्याच योजनांची नावे बदलून हे सरकार काम करीत आहे. 
 
एकही नवी योजना सुरू केली नाही. ज्या चांगल्या योजना होत्या, त्या बंद पाडल्या. मुस्लीम, मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही. शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, उलट भाजपा सरकारमध्ये त्या वाढल्या. त्यामुळे येणा-या काळात भाजपाला सत्तेतून घालवण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री नसीम खान यांनी महापालिकेचे निकाल हे राजकारणाची दिशा बदलवणारे निकाल असतील, असा आशावाद व्यक्त केला.
 
राजीनामा देणार पण तारीख नाही सांगणार 
भाजपासोबत सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कोणी विचारत नाही, राजीनामा खिशात असल्याच्या वल्गना हे मंत्री करतात. हा प्रकार म्हणजे ‘मंदिर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे’ याच धर्तीवर ‘इस्तीफा जरूर देगें पर तारीख नही बतायेंगे’ असाच आहे असा आरोप चव्हाण यांनी केला. चव्हाण यांनी भाजपा-सेनेवर तोंडसुख घेतांना राष्ट्रवादीवर टीका करणे मात्र टाळले.