शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गुंडांचे पुनर्वसन करणारं भाजपाचं सरकार - अशोक चव्हाण

By admin | Updated: February 11, 2017 18:22 IST

केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आलेले भाजपा सरकारमुळे गुंडांना चांगले दिवस आले. असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 11 -  केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये आलेले भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील सरकार आहे. या सरकारमध्ये सामान्यांचे भले होत नाही, मात्र गुंडांना चांगले दिवस आलेत. असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.  
 
काँग्रेसच्या काळात सरकारमध्ये मदत व पुनर्वसन खाते होते, भाजपाच्या काळात हेच खाते गुंडांसाठी मदत व पुनर्वसन असे झाले असून, हे सरकार केवळ गुंडांचे पुनर्वसन करणारे सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. 
 
अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ स्थानिक स्वराज्य भवन मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री नसीम खान, डॉ. नितीन राऊत, आमदार भाई जगताप, महानगराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी आदी उपस्थित होते. 
 
या सरकारचे मंत्री गुंडांची स्तुती करतात. त्यांना आधी पक्षात घेऊ, निवडून आणू व मग सुधरवणार, अशी भाषा करतात. केवळ गुंडांचे पुनर्वसन हाच या सरकारचा अजेंडा असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. काँग्रेसच्या काळात ज्या योजना राबवल्या गेल्या, त्याच योजनांची नावे बदलून हे सरकार काम करीत आहे. 
 
एकही नवी योजना सुरू केली नाही. ज्या चांगल्या योजना होत्या, त्या बंद पाडल्या. मुस्लीम, मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही. शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, उलट भाजपा सरकारमध्ये त्या वाढल्या. त्यामुळे येणा-या काळात भाजपाला सत्तेतून घालवण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री नसीम खान यांनी महापालिकेचे निकाल हे राजकारणाची दिशा बदलवणारे निकाल असतील, असा आशावाद व्यक्त केला.
 
राजीनामा देणार पण तारीख नाही सांगणार 
भाजपासोबत सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कोणी विचारत नाही, राजीनामा खिशात असल्याच्या वल्गना हे मंत्री करतात. हा प्रकार म्हणजे ‘मंदिर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे’ याच धर्तीवर ‘इस्तीफा जरूर देगें पर तारीख नही बतायेंगे’ असाच आहे असा आरोप चव्हाण यांनी केला. चव्हाण यांनी भाजपा-सेनेवर तोंडसुख घेतांना राष्ट्रवादीवर टीका करणे मात्र टाळले.