शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

भाजप सरकारने शेतकरी, शेतमजुरांना कंगाल केले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:10 IST

गेल्या तीन वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी व सरकारी धोरण, शेतमालाला मिळालेल्या कमी भावामुळे शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. अशातच सरकारने अचानक कॅशलेस केल्यामुळे तर सगळ्याच शेतमालाचे भाव एकाच फटक्यात निम्म्यावर आणून शेतकर्‍यांना कंगाल केले असल्याची टीका किसान मंचचे निमंत्रक शेतकरी नेते शंकरअण्णा धोंगडे यांनी केली. कानडी येथील शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देशंकरअण्णा धोंगडे यांची टीकाकानडी येथे शेतकरी सुरक्षा अभियानांतर्गत सभा

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गेल्या तीन वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी व सरकारी धोरण, शेतमालाला मिळालेल्या कमी भावामुळे शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. अशातच सरकारने अचानक कॅशलेस केल्यामुळे तर सगळ्याच शेतमालाचे भाव एकाच फटक्यात निम्म्यावर आणून शेतकर्‍यांना कंगाल केले असल्याची टीका किसान मंचचे निमंत्रक शेतकरी नेते शंकरअण्णा धोंगडे यांनी केली. कानडी येथील शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. किसान मंचच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातील कानडी येथे मेळावा व बैठक आयोजित करण्यात आली होती. मेळाव्याला संबोधित करताना धोंगडे यांनी भाजप, सेना सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की शेतकरी ऊठसूट किंवा मागायचे म्हणून मागत नाही तर शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कष्टकर्‍यांवर यापूर्वी कधी नव्हे एवढे आर्थिक अरिष्ट ओढवल्याने ते कर्जमाफीची मागणी करीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे सहकारी निवडणुकीपूर्वी दिलेली वचने व आश्‍वासने पूर्ण करण्याऐवजी टिंगलटवाळी व कुचेष्टा करण्यातच धन्यता मानत आहेत, असे ते म्हणाले.धोंगडे हे किसान मंच (महाराष्ट्र)चे निमंत्रक असून, त्यांचे अभियान ५५ दिवसांचे आहे. राज्यातील ३0 जिल्ह्यातून फिरून अभियानाचा समारोप २ ऑक्टोबर रोजी होणार्‍या नाशिकच्या शेतकरी मेळाव्यात होणार आहे. शेतकरी, शेतमजुरांसाठी सरकारकडे केलेल्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास नाशिकच्या शेतकरी अधिवेशनात सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन केल्या जाणार असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले.या मेळाव्याचे आयोजन शेतकरी जागर मंचच्यावतीने करण्यात आले होते. किशोर माथनकर किसान मंच संयोजक व प्रशांत गावंडे जागर मंच यांनी या सभेत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात मनोज तायडे, जगदीश मुरूमकर, जि. प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, अशोक लोडम, वसंतराव माळोकार, पंजाबराव गावंडे, बाळकृ ष्ण पाटील, शिवाजी म्हैसने, शेख अन्सार आदी उपस्थित होते.