शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

हरभरा घोटाळ्यात बडे मासे गळाला लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:55 IST

अकोला : अनुदानित हरभरा बियाण्याची उचल महाबीज,  कृभको, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून केल्यानंतर त्याचे वाटप  अस्तित्वात नसलेल्या शेतकर्‍यांना झाल्याची बाब कृषी  विभागाच्या चौकशीत उघड झाली. पत्ते नसलेले, तालुक्याबाहेरचे  तसेच अस्तित्वात नसलेले शेतकरी यादीत कसे आले, याचा  खुलासा आता संबंधितांना करावा लागणार आहे. त्यामध्ये सुरुवा तीपासूनच संशयाची सुई असलेले अकोला शहरातील वितरक  स्वाती सीड्स, शाह एजन्सी आणि स्नेहसागर एन्टरप्रायजेस, दीपक  कृषी केंद्र यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देआधीच्या कारवाईतून सुटल्यानंतर पुन्हा फास आवळणार!नोटिसमध्ये दिली शेतकर्‍यांची नावे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अनुदानित हरभरा बियाण्याची उचल महाबीज,  कृभको, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून केल्यानंतर त्याचे वाटप  अस्तित्वात नसलेल्या शेतकर्‍यांना झाल्याची बाब कृषी  विभागाच्या चौकशीत उघड झाली. पत्ते नसलेले, तालुक्याबाहेरचे  तसेच अस्तित्वात नसलेले शेतकरी यादीत कसे आले, याचा  खुलासा आता संबंधितांना करावा लागणार आहे. त्यामध्ये सुरुवा तीपासूनच संशयाची सुई असलेले अकोला शहरातील वितरक  स्वाती सीड्स, शाह एजन्सी आणि स्नेहसागर एन्टरप्रायजेस, दीपक  कृषी केंद्र यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.जिल्हय़ातील शेतकर्‍यांना गेल्यावर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित  किमतीवर हरभरा बियाणे देण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा  अभियानांतर्गत राज्याच्या कृषी विभागाने महाबीजसह इतर उत् पादन कंपन्यांना बियाणे पुरवठय़ाचे आदेश दिले. अनुदानित दराने  बियाणे दिल्यानंतरही त्याचे वाटप त्या दराने न करता दडवून  ठेवण्यात आले. त्याची विक्री काही प्रमाणात दलालांना करण्यात  आली. काही वितरकांनी खुल्या बाजारातील भावाने विक्री केली,  तर काहींनी बियाण्यांच्या बॅग बदलून थेट बाजारातच विक्री  केल्याचा प्रकार घडला. महाबीजने तब्बल १२ हजार क्विंटल  बियाण्यांपैकी सात हजार क्विंटल बियाणे अकोला शहरातील  चारच वितरकांना दिले. त्याचा कुठलाही हिशेब त्या चौघांनी दिला  नव्हता. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्यावर कारवाईची तयारी जिल्हा  परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी केली; मात्र  कारवाईचे अधिकार, योजना राबवणारी यंत्रणा, पुरवठादार  यंत्रणेबाबत साक्षात्कार झाल्याने ही कारवाई मध्येच थांबली.  दरम्यान, हजारो क्विंटल हरभरा बियाण्यांतील कोट्यवधी रुपयांचा  भ्रष्टाचार दाबण्याची पुरेपूर तयारीही झाली. त्याचवेळी अमरावती  विभागाच्या कृषी सहसंचालकांच्या पथकाने चौकशी केली.  त्यामध्ये योजना राबवण्यात प्रचंड घोळ असल्याचे पुढे आले. त्या  अहवालानुसार कृषी केंद्रांच्या प्राधिकार पत्रावर कारवाई करण्याचे  जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला सांगण्यात आले. त्यावर जिल्हा  परिषदेचे कृषी विकास अधिकारी ममदे यांनी जिल्हय़ातील १४६  केंद्र संचालकांना नोटिस दिल्या.