शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंचा बंद

By admin | Updated: May 20, 2017 01:28 IST

अकोला : महापालिका प्रशासनाने अवाजवी कर वाढ केल्याचा आरोप करीत मनपातील भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी पुकारलेल्या जठारपेठ बंदला व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला.

व्यावसायिकांचा संमिश्र प्रतिसादलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने अवाजवी कर वाढ केल्याचा आरोप करीत मनपातील भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी पुकारलेल्या जठारपेठ बंदला व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. पक्षाच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारनंतर व्यावसायिकांनी दुकाने पूर्ववत सुरू केल्याचे दिसून आले. महापालिका प्रशासनाने शहरातील मालमत्तांचे पहिल्यांदाच ‘जीआयएस’ प्रणालीच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. मालमत्तांचे अचूक मोजमाप केल्यानंतर ३० ते ६० टक्क्यांपर्यंत कराच्या रकमेत वाढ केली. ही वाढ अवास्तव असून, यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांवर अतिरिक्त बोजा पडत असल्याचे स्पष्ट करीत महापालिकेच्या करवाढीला मनपातील विरोधी पक्ष भारिप-बमसंने विरोध दर्शविला. कर वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव, नगरसेविका किरण बोराखडे, नगरसेवक बबलू जगताप यांनी १९ मे रोजी जठारपेठ परिसर बंदची हाक दिली होती. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत परिसरातील व्यावसायिक त्यांची दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवतील, असे भारिपच्या वतीने नमूद करण्यात आले होते. भारिपने बंद पुकारल्यानंतर दुपारनंतर व्यावसायिकांनी त्यांची प्रतिष्ठाने, दुकाने पूर्ववत सुरू केल्याचे दिसून आले. परिसरातील व्यावसायिकांनी बंदला संमिश्र प्रतिसाद दिला.स्वाक्षरी मोहीम राबविली!करवाढीच्या मुद्यावर नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी भारिप-बमसंच्या वतीने जठारपेठ भागात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यावेळी गटनेत्या धनश्री देव, नगरसेविका किरण बोराखडे, नगरसेवक बबलू जगताप, डॉ. राजकुमार रंगारी, प्रतिभा अवचार, अरुंधती शिरसाट, वंदना वासनिक, विजय वाघ, दिलीप देशपांडे, बबलू तिवारी, भीमराव तायडे आदी उपस्थित होते.