शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बीजी-२ कापसाचे नवे संशोधन सूक्ष्म सिंचनावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 04:42 IST

पाऊस लांबला; पिकांनी टाकली मान.

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील पहिले देशी बीजी-२ कापसाचे वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. या वाणाची कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर सध्या चाचणी घेणे सुरू आहे; पण पावसाने दडी मारल्याने हे संशोधन सूक्ष्म सिंचनावर (ड्रिप्स) जगविण्यात येत आहे. भरपूर पाणी नसल्याने या चाचणीचे काय निष्कर्ष येतात, हे पिकाची पूर्ण वाढ झाल्यावर कळणार आहे.देशातील पहिले बीजी-२ कापसाचे पीडीकेव्ही-जेकेएल -११६ वाण तयार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन विभागांतर्गत पश्‍चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर सध्या या संशोधित वाणाच्या चाचणीसाठी पेरणी करण्यात आली आहे. पेरणीला १0 दिवस झाले आहेत; परंतु पावसाने दडी मारल्याने अंकुरलेले कापसाचे वाण कोमेजले आहे. सात-आठ वर्षांंंंच्या प्रदीर्घ संशोधनानंतर हे वाण विकसित करण्यात यश आले आहे आणि नेमके चाचणीच्या वेळीच पावसाचे पाणी नसल्याने कृषी शास्त्रज्ञांची धावपळ सुरू आहे. सध्या ही चाचणी पीक दोन पानावर आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला जिल्हा खारपाणपट्टय़ात आहे. येथील भूगर्भातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. कृषी विद्यापीठाकडे या पाण्याशिवाय दुसरा पाण्याचा स्रोत नसल्याने हेच पाणी या संशोधनासाठी ड्रिपद्वारे देण्यात येत आहे. त्याचा परिणाम समोर येईलच; पण शास्त्रज्ञांची घालमेल सुरू आहे.कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर इतरही अतिघनता कापसाची बीजोत्पादनासाठी पेरणी करण्यात येत आहे; पण पाऊसच नाही. यावर्षी बहुतांश खरीप पिकांचे मोठय़ा प्रमाणात बीजोत्पादन घेण्याचा कृषी विद्यापीठाचा विचार आहे. त्यासाठी वेळेत पेरणी होणे गरजेचे आहे; परंतु सर्वकाही पावसावर अवलंबून असल्याने कृषी शास्त्रज्ञ हतबल आहेत.कृषी विद्यापीठाच्या पाणलोट क्षेत्रावर विविध पाण्याचे मॉडेल तयार करण्यात आले आहेत. आता या सर्वांंंंंसाठी पावसाची गरज आहे.बीजी-२ कापसाची चाचणी घेण्यात येत आहे. पाऊस नसल्याने सूक्ष्म सिंचनावर संगोपन सुरू आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. - डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.