शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

सावधान, माती होतेय प्रदूषित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जगभरातील अनेक सुपीक जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत. त्यामुळे मातीच्या ...

रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जगभरातील अनेक सुपीक जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत. त्यामुळे मातीच्या जैविक गुणांचा ऱ्हास होत आहे, मातीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम अन्न सुरक्षेवर झाल्याचे दिसून आले आहे. आता मृदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. मृदेच्या संवर्धनासाठी २०१५ ला सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मृदेचे स्वास्थ्य टिकवणे, शेतीच्या शाश्वत विकास करणे आणि त्याद्वारे अन्नसुरक्षा करणे हा उद्देश आहे. ही काळाची गरजही आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी माती परीक्षणाकडे वळले असल्याचे दिसून येते. कृषी विद्यापीठाच्या प्रयोग शाळेत झालेल्या परीक्षणामध्ये परिसरातील जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. तर नत्र, स्फुरद, गंधक यांचे प्रमाण कमी आहे.

पाच वर्षांत विद्यापीठाकडे परीक्षणासाठी प्राप्त नमुने

वर्ष प्राप्त नमुने

२०१६-१७ १७३८

२०१७-१८ १२७४

२०१८-१९ ३४९३

२०१९-२० २१९६

२०२०-२१ ११३८

नत्रांचा अतिरेक हानिकारक

नत्रयुक्त खतांच्या अतिरेकी वापरामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होते. लहान मुलांमध्ये ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ विकृती आढळून येते. पिकांमधील नत्र स्थिरीकरण प्रक्रिया मंदावते. कीटकनाशके, तणनाशकाचा असंतुलित वापरामुळे मातीमधील जैविक घटक तसेच इतर जीवसृष्टी धोक्यात आली आहे. शहरातील टाकाऊ पदार्थ, घनकचरा, कर्करोगास कारणीभूत जड धातू आदी घटकांमुळे विविध प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी हे आवश्यक

जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म बिघडले आहेत. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. परिणामी उत्पादकता कमी होते. मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर कमी करावा लागेल. मातीचा दर्जा सुधारण्यासाठी जैविकरीत्या विघटित होणाऱ्या घटकांचा वापर करावा लागेल.

संवर्धित शेती काळाजी गरज

जमिनीची कमी मशागत करणे, जमिनीचे जास्तीत जास्त आच्छादन करणे व पिकांची फेरपालट हे तीन तत्त्व संवर्धित शेतीचे आहे. ही शेती काळाची गरज बनली असून याबाबत कृषी विद्यापीठाने शिफारशी दिल्या आहे.

शेतकऱ्यांनी जमिनीचे व्यवस्थापन करताना सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्यावे, त्यानुसार खतांच्या मात्र कमी द्याव्या, त्यासोबतच शिफारशीत मात्रा कमी करावयाच्या असल्यास एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा पर्याय निवडावा. यामधून कंपोस्ट खत, शेणखत, हिरवळीची खते, जीवाणू खते, पिकांची फेरपालट या बाबींचा अवलंब करावा.

- डॉ. प्रकाश कडू, विभाग प्रमुख, मातीपरीक्षण विभाग, डॉ.पंदेकृवि