शहरं
Join us  
Trending Stories
1
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
2
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
3
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
4
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
5
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट
6
‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
7
लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली
8
GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
9
Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!
10
Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
11
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
12
"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
13
Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!
14
बाळाचं नाव ठेवण्यासाठी महिला घेतले तब्बल २७ लाख! आतापर्यंत ५०० मुलांचे नामकरण! काय आहे वैशिष्ट्ये?
15
धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क मे'च्या टीझरमध्ये दिसतोय प्रेमातील विश्वासघाताचा थरार; अंगावर शहारा आणणारे दर्दी संवाद
16
PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा
17
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
18
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
19
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
20
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन

सावधान, माती होतेय प्रदूषित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जगभरातील अनेक सुपीक जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत. त्यामुळे मातीच्या ...

रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जगभरातील अनेक सुपीक जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत. त्यामुळे मातीच्या जैविक गुणांचा ऱ्हास होत आहे, मातीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम अन्न सुरक्षेवर झाल्याचे दिसून आले आहे. आता मृदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. मृदेच्या संवर्धनासाठी २०१५ ला सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मृदेचे स्वास्थ्य टिकवणे, शेतीच्या शाश्वत विकास करणे आणि त्याद्वारे अन्नसुरक्षा करणे हा उद्देश आहे. ही काळाची गरजही आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी माती परीक्षणाकडे वळले असल्याचे दिसून येते. कृषी विद्यापीठाच्या प्रयोग शाळेत झालेल्या परीक्षणामध्ये परिसरातील जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. तर नत्र, स्फुरद, गंधक यांचे प्रमाण कमी आहे.

पाच वर्षांत विद्यापीठाकडे परीक्षणासाठी प्राप्त नमुने

वर्ष प्राप्त नमुने

२०१६-१७ १७३८

२०१७-१८ १२७४

२०१८-१९ ३४९३

२०१९-२० २१९६

२०२०-२१ ११३८

नत्रांचा अतिरेक हानिकारक

नत्रयुक्त खतांच्या अतिरेकी वापरामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होते. लहान मुलांमध्ये ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ विकृती आढळून येते. पिकांमधील नत्र स्थिरीकरण प्रक्रिया मंदावते. कीटकनाशके, तणनाशकाचा असंतुलित वापरामुळे मातीमधील जैविक घटक तसेच इतर जीवसृष्टी धोक्यात आली आहे. शहरातील टाकाऊ पदार्थ, घनकचरा, कर्करोगास कारणीभूत जड धातू आदी घटकांमुळे विविध प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी हे आवश्यक

जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म बिघडले आहेत. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. परिणामी उत्पादकता कमी होते. मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर कमी करावा लागेल. मातीचा दर्जा सुधारण्यासाठी जैविकरीत्या विघटित होणाऱ्या घटकांचा वापर करावा लागेल.

संवर्धित शेती काळाजी गरज

जमिनीची कमी मशागत करणे, जमिनीचे जास्तीत जास्त आच्छादन करणे व पिकांची फेरपालट हे तीन तत्त्व संवर्धित शेतीचे आहे. ही शेती काळाची गरज बनली असून याबाबत कृषी विद्यापीठाने शिफारशी दिल्या आहे.

शेतकऱ्यांनी जमिनीचे व्यवस्थापन करताना सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्यावे, त्यानुसार खतांच्या मात्र कमी द्याव्या, त्यासोबतच शिफारशीत मात्रा कमी करावयाच्या असल्यास एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा पर्याय निवडावा. यामधून कंपोस्ट खत, शेणखत, हिरवळीची खते, जीवाणू खते, पिकांची फेरपालट या बाबींचा अवलंब करावा.

- डॉ. प्रकाश कडू, विभाग प्रमुख, मातीपरीक्षण विभाग, डॉ.पंदेकृवि