शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या भूलथापापासून सावध

By admin | Updated: May 20, 2014 19:31 IST

अकोलाशहराबाहेरील अनेक इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कंपन्या, कन्सलटन्सी एजन्सी शहरात येऊन कोणतीही वैधानिक मान्यता नसताना कार्यालये थाटतात आणि नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवितात. आवळा देऊन भोपळा काढण्याची या कंपनी संचालकांची खोड जुनीच आहे. त्यांच्या आमिषाला बळी पडून दररोज कुठे ना कुठे, नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी अलीकडे वाढू लागल्या आहेत.

अकोला: शहराबाहेरील अनेक इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कंपन्या, कन्सलटन्सी एजन्सी शहरात येऊन कोणतीही वैधानिक मान्यता नसताना कार्यालये थाटतात आणि नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवितात. आवळा देऊन भोपळा काढण्याची या कंपनी संचालकांची खोड जुनीच आहे. त्यांच्या आमिषाला बळी पडून दररोज कुठे ना कुठे, नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी अलीकडे वाढू लागल्या आहेत. या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश भुयार यांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वीच शहरात नागपूरच्या श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचे समीर जोशी, पल्लवी जोशी व त्यांचे एजंट मोहन पितळे, मुकुंद पितळे, मंगेशी पितळेसह चार एजंटांविरुद्ध रामदासपेठ व खदान पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. शहरातील गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांनी श्रीसूर्या कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप केला. यासोबतच शहरात दररोज नागरिकांची फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे घडत आहेत. राज्याबाहेरील अनेक इन्व्हेस्टमेंट, फायनान्स कंपन्या शहरात येऊन नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून आमिष दाखवितात आणि कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगतात. काही महिने गुंतवणूकदाराला योजनेचा लाभ देतात. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली की आपला गाशा गुंडाळतात. नंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. यापूर्वी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. पैसे गुंतवणूक केलेल्या कंपनीची माहिती घेऊन, त्याबाबत खात्री करावी, असेही आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश भुयार यांनी सांगितले. छाया: इंटरनेटवरून आर्थिक गुन्ह्यांशी संबधित छायाचित्र वापरावे बातमीत बॉक्स आहेत. बॉक्स : मान्यता नसलेल्या कंपन्या याचा घेतात आधार नागरिकांचा विश्वास संपादन करायचा असल्याने कोणतीही वैधानिक मान्यता नसलेल्या फायनान्स कंपन्या, इन्व्हेस्टमेंट कंपन्या, संस्था कार्यालयाच्या फलकावर नोंदणी क्रमांक म्हणून शॉप ॲक्ट लायसन्स क्रमांक, पॅनकार्ड क्रमांकाचा आधार घेतात आणि शासनाची मान्यता असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करतात. अशा कंपन्यापासून नागरिकांनी सावध राहावे.