शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

शहरात उपाशी मरण्यापेक्षा गावी गेलेलंच बरं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST

अकोला : लॉकडाऊनमुळे शहरांमधील उद्योगधंदे पुन्हा एकदा ठप्प झाले आहेत. हाताला काम नसल्याने कामगारांवर खूप मोठे आर्थिक संकट ओढवले ...

अकोला : लॉकडाऊनमुळे शहरांमधील उद्योगधंदे पुन्हा एकदा ठप्प झाले आहेत. हाताला काम नसल्याने कामगारांवर खूप मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शहरात उपाशी मरण्यापेक्षा मूळ गावाकडे परतण्यास कामगारांनी पसंती दिल्याने एस. टी. बस व रेल्वेने कामगार गावी रवाना होत आहेत. गतवर्षी लॉकडाऊनमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावाकडे गेले होते. एवढेच नव्हे तर, त्यावेळी वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश होते. त्यामुळे दुहेरी संकट कामगारांसमोर होते. स्वत:जवळ असलेली सर्व जमा-पुंजी संपल्यामुळे शहरात दिवस काढणे कामगारांसाठी खूप कठीण होऊन बसले होते. अशा परिस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने त्यांनी आपले गाव गाठले. काहींनी तर चक्क पायीच गावाची वाट धरल्याचेही पाहायला मिळाले.

--बॉक्स--

पुणे मार्गावर सर्वाधिक गर्दी

जिल्ह्यातून पुणे, मुंबई येथे कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने तेथे गेलेले कामगार जिल्ह्यात परतत आहेत. यामुळे या मार्गावर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यामध्ये अनेक परप्रांतीय मजूर आहेत. लॉकडाऊनच्या भीतीने ते रेल्वेने आपल्या घरची वाट धरत आहेत. मध्यप्रदेशमधील काही कामगार रेल्वेने गावी निघाले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागामधून नागपूर, औरंगाबाद येथे जाणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे. यामुळे या मार्गावरही गर्दी दिसत आहे.

--कोट--

पुन्हा तीच परिस्थिती येऊ नये!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शासनाने आता वीकेंड लॉकडाऊन सुरू केले आहे. मागील वर्षासारखी अडचण येऊ नये, त्यामुळे आम्ही पुन्हा गावाकडेच परतत आहोत.

- नितीन तिवारी

--कोट--

उपाशी राहण्याची वेळ येईल!

शहरातील कडक निर्बंधांमुळे पुन्हा नोकरीवर संकट उभे राहिले आहे. अशातच लॉकडाऊन लागल्यास उपाशी राहण्याची वेळ येईल. त्यामुळे गावाकडे परत आलो आहे.

- अमित पाटील

--कोट--

व्यवसाय बंद

यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काम करत असलेला व्यवसाय बंद आहे. आणखी काही दिवस शहरात थांबल्यास अडचणी वाढतील. त्यामुळे गावी परत जात आहे.

- शुभम इंगळे