शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरात उपाशी मरण्यापेक्षा गावी गेलेलंच बरं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST

अकोला : लॉकडाऊनमुळे शहरांमधील उद्योगधंदे पुन्हा एकदा ठप्प झाले आहेत. हाताला काम नसल्याने कामगारांवर खूप मोठे आर्थिक संकट ओढवले ...

अकोला : लॉकडाऊनमुळे शहरांमधील उद्योगधंदे पुन्हा एकदा ठप्प झाले आहेत. हाताला काम नसल्याने कामगारांवर खूप मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शहरात उपाशी मरण्यापेक्षा मूळ गावाकडे परतण्यास कामगारांनी पसंती दिल्याने एस. टी. बस व रेल्वेने कामगार गावी रवाना होत आहेत. गतवर्षी लॉकडाऊनमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावाकडे गेले होते. एवढेच नव्हे तर, त्यावेळी वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश होते. त्यामुळे दुहेरी संकट कामगारांसमोर होते. स्वत:जवळ असलेली सर्व जमा-पुंजी संपल्यामुळे शहरात दिवस काढणे कामगारांसाठी खूप कठीण होऊन बसले होते. अशा परिस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने त्यांनी आपले गाव गाठले. काहींनी तर चक्क पायीच गावाची वाट धरल्याचेही पाहायला मिळाले.

--बॉक्स--

पुणे मार्गावर सर्वाधिक गर्दी

जिल्ह्यातून पुणे, मुंबई येथे कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने तेथे गेलेले कामगार जिल्ह्यात परतत आहेत. यामुळे या मार्गावर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यामध्ये अनेक परप्रांतीय मजूर आहेत. लॉकडाऊनच्या भीतीने ते रेल्वेने आपल्या घरची वाट धरत आहेत. मध्यप्रदेशमधील काही कामगार रेल्वेने गावी निघाले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागामधून नागपूर, औरंगाबाद येथे जाणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे. यामुळे या मार्गावरही गर्दी दिसत आहे.

--कोट--

पुन्हा तीच परिस्थिती येऊ नये!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शासनाने आता वीकेंड लॉकडाऊन सुरू केले आहे. मागील वर्षासारखी अडचण येऊ नये, त्यामुळे आम्ही पुन्हा गावाकडेच परतत आहोत.

- नितीन तिवारी

--कोट--

उपाशी राहण्याची वेळ येईल!

शहरातील कडक निर्बंधांमुळे पुन्हा नोकरीवर संकट उभे राहिले आहे. अशातच लॉकडाऊन लागल्यास उपाशी राहण्याची वेळ येईल. त्यामुळे गावाकडे परत आलो आहे.

- अमित पाटील

--कोट--

व्यवसाय बंद

यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काम करत असलेला व्यवसाय बंद आहे. आणखी काही दिवस शहरात थांबल्यास अडचणी वाढतील. त्यामुळे गावी परत जात आहे.

- शुभम इंगळे