शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वन्य प्राण्यांपासून बचावासाठी बनविले घंटी यंत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST

अकोला : शेतकरी शेतात दिवसभर काम करतात. रात्री वन्यप्राणी पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिश्रमावर ...

अकोला : शेतकरी शेतात दिवसभर काम करतात. रात्री वन्यप्राणी पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिश्रमावर पाणी फेरल्या जाते. या वन्य प्राण्यांपासून पिकांचा बचाव होण्यासाठी रुस्तमाबाद येथील शेतकरी गजानन निलखण यांनी कल्पकतेतून शेतकरी घंटी यंत्र बनविले आहे. केवळ नावापुरता हे यंत्र न बनविता, अशी आठ हजार यंत्रे स्वत: तयार करून राज्यभरातील शेतकऱ्यांना विकली आहे. या जुगाडमुळे शेतकऱ्याला रोजगारही मिळाला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथील शेतकरी निलखण यांनी खासगी कंपनीतील काम सोडल्यानंतर गावी परतले. तेथे त्यांनी शेती करायला सुरुवात केली. शेतात मूग पेरल्याने त्यांच्या वडिलांनी या पिकांचे वन्यप्राणी नुकसान करत असल्याचे सांगितले. निलखण यांचे आयटीआय झाले होते. त्यामुळे त्यांनी पत्र्याचे विविध पंखे तयार केले. या जुगाडातून त्यांना घंटी यंत्र बनविण्यात यश आले. सुरुवातीला हे यंत्र त्यांनी स्वत:च्या शेतात लावले. या यंत्रामुळे वन्यप्राणी व पाखरे पिकांपासून दूर राहत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. त्यामुळे गावकऱ्यांनीही हे यंत्र बनवून देण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांना व नातेवाइकांना हे यंत्र बनवून दिले. यंत्राला वाढती मागणी पाहता त्यांनी हे यंत्र बनविण्याचा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. पाहता पाहता राज्यभरात या यंत्राची विक्री केली.

स्टार्टअप फेस्टमध्ये विशेष आकर्षण

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काही वर्षांआधी स्टार्टअप फेस्टचे आयोजन केले होते. यामध्ये ६० स्टार्टअप प्रयोगांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये हे घंटी यंत्र विशेष आकर्षण होते. यामध्ये ५ स्टार्टअपमध्ये या यंत्राची निवड झाली. येथूनच शेतकरी निलखण यांच्या व्यवसायाला चालना मिळाली.

राज्याबाहेरही यंत्राची विक्री

शेतकऱ्यांने या यंत्राचा अकोल्यासह वाशीम, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, जिंतूर, सातारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात पुरवठा केला आहे. सोबतच मध्य प्रदेशातील इंदोर येथेही ही यंत्रे दिली आहे.

घंटी यंत्राला खर्च कमी लागत असून देखभालीचा खर्च येत नाही. त्यामुळेही चांगली मागणी आहे. कृषी विद्यापीठातही ही यंत्रे लावण्यात आली आहे.

- गजानन निलखण, शेतकरी