शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
3
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
4
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
5
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
6
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
7
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
8
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
9
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
10
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
11
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
12
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
13
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
14
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
15
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
16
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
17
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
18
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
19
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  

दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना ‘अथार’ चा आधार !

By admin | Updated: June 24, 2016 23:43 IST

पेरणीसाठी मदतीचा हात; शेतक-यांना दिले जाते जेवण.

नाना हिवराळे / खामगावगेल्या तीन वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच महागाईने कंबरडे मोडले असून खरिपातील पेरणीच्या सोयीसाठी शेतकरी प्रयत्नरत आहेत. दरम्यान, पेरणीसाठी वाढलेला खर्च शेतकर्‍यांना झेपावणारा नसल्यामुळे ग्रामीण भागातील पेरणीची अथार ही पद्धत शेतकर्‍यांना आधार ठरणार आहे.शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी आदी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. बैलाची संख्या कमी असल्याने पेरणीचा अवाजवी खर्च शेतकर्‍यांना पेलावा लागत आहे. सायळ पद्धतीने पेरणी केली जात असे यामुळे पेरणीच्या खर्चाची बचत होत असे; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दुसर्‍याकडून पेरणी करताना शेतकर्‍यांना ट्रॅक्टरने ४00 रुपये प्रती एकर तर बैलजोडीने ७00 रुपये एकर किंमत मोजावी लागत आहे. अगोदरच सततच्या दुष्काळाने शेतकरी पार खचला आहे. गत तीन वर्षांपासून शेतीतून पेरणीच्या खर्चाऐवढेही उत्पन्न निघाले नसल्याने दरवर्षी कर्जाचे पुनर्गठन सुरू आहे. यामुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे. बी-बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ग्रामीण भागात फार पूर्वीपासून पेरणीची अथार पद्धत प्रचलित होती; मात्र काळाच्या ओघात काही प्रमाणात ती मागे पडली आहे. परंतु सद्यस्थितीत हीच अथार पद्धत शेतकर्‍यांना आधारवड ठरू शकते. गावातील ज्या शेतकर्‍याकडे पेरणीसाठी बैलजोडी नसेल व त्यांची आर्थिक स्थिती नाजूक असेल तर अशा शेतकर्‍यांची शेती पडीक राहू नये याकरिता इतर शेतकरी त्या शेताची पेरणी करीत असत. या पेरणीसाठी लागणार्‍या खर्चाची रक्कम न घेता त्या शेतकर्‍याजवळून केवळ मोबदला म्हणून एक वेळचे जेवण घेतले जायचे. यामुळे गरीब शेतकर्‍यांना अथार पद्धतीचा आधार होत असे.