शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना ‘अथार’ चा आधार !

By admin | Updated: June 24, 2016 23:43 IST

पेरणीसाठी मदतीचा हात; शेतक-यांना दिले जाते जेवण.

नाना हिवराळे / खामगावगेल्या तीन वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच महागाईने कंबरडे मोडले असून खरिपातील पेरणीच्या सोयीसाठी शेतकरी प्रयत्नरत आहेत. दरम्यान, पेरणीसाठी वाढलेला खर्च शेतकर्‍यांना झेपावणारा नसल्यामुळे ग्रामीण भागातील पेरणीची अथार ही पद्धत शेतकर्‍यांना आधार ठरणार आहे.शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी आदी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. बैलाची संख्या कमी असल्याने पेरणीचा अवाजवी खर्च शेतकर्‍यांना पेलावा लागत आहे. सायळ पद्धतीने पेरणी केली जात असे यामुळे पेरणीच्या खर्चाची बचत होत असे; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दुसर्‍याकडून पेरणी करताना शेतकर्‍यांना ट्रॅक्टरने ४00 रुपये प्रती एकर तर बैलजोडीने ७00 रुपये एकर किंमत मोजावी लागत आहे. अगोदरच सततच्या दुष्काळाने शेतकरी पार खचला आहे. गत तीन वर्षांपासून शेतीतून पेरणीच्या खर्चाऐवढेही उत्पन्न निघाले नसल्याने दरवर्षी कर्जाचे पुनर्गठन सुरू आहे. यामुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे. बी-बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ग्रामीण भागात फार पूर्वीपासून पेरणीची अथार पद्धत प्रचलित होती; मात्र काळाच्या ओघात काही प्रमाणात ती मागे पडली आहे. परंतु सद्यस्थितीत हीच अथार पद्धत शेतकर्‍यांना आधारवड ठरू शकते. गावातील ज्या शेतकर्‍याकडे पेरणीसाठी बैलजोडी नसेल व त्यांची आर्थिक स्थिती नाजूक असेल तर अशा शेतकर्‍यांची शेती पडीक राहू नये याकरिता इतर शेतकरी त्या शेताची पेरणी करीत असत. या पेरणीसाठी लागणार्‍या खर्चाची रक्कम न घेता त्या शेतकर्‍याजवळून केवळ मोबदला म्हणून एक वेळचे जेवण घेतले जायचे. यामुळे गरीब शेतकर्‍यांना अथार पद्धतीचा आधार होत असे.