शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बार्शीटाकळीची पाणी समस्या सुटणार!

By admin | Updated: July 3, 2017 01:31 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशाने रखडलेली पाणीपुरवठा योजना लागणार मार्गी!

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : येथील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचातयचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने रखडली होती. याविषयी गावातील नजमअली खान नसीमअली खान यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने रखडलेली पाणीपुरवठा योजना एका वर्षात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे. बार्शीटाकळी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सन २०१० ला ग्रामपंचायतने मासिक सभेत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत काम मंजूर व्हावे, याकरिता ठराव मंजूर केला होता, तसेच पहिल्या आमसभेमध्ये याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. या गावाकरिता १२ कोटी ९० लाख रुपयांची योजना मंजूर झाली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने गावात सर्वेक्षण जागासुद्धा निश्चित केली होती. यापैकी नऊ कोटी रुपये आरक्षित ठेवले होते. शासनाने १ आॅगस्ट २०१५ रोजी बार्शीटाकळी ग्रामपंचायत रद्द करून नगरपंचायत जाहीर केली होती. ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्याने पाणीपुरवठा योजना रखडली होती. हिवाळी अधिवेशनात ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणली होती. त्यांनी पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत बार्शीटाकळी ग्रामपंचायतच कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून बार्शीटाकळीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर केले होते, त्यामुळे मंजूर होऊनही योजनेचे काम बंद पडले आहे. याविषयी नजमअली खान नसीमअली खान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने एक वर्षाच्या आत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.कायमस्वरूपी पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन उपसरपंच सविता शंकरराव वरगट, जि.प. सदस्य रेहानाबी आलमगीर खान, बार्शीटाकळी पंचायत समितीचे उपसभापती सैयद फारुख सैयद मुश्ताक, डॉ.मुदस्सीर खान, हाजी सैयद नकीम, सै.इमदाद गाजीखान आदी प्रयत्न करीत आहेत. न्यायालयाच्या निकालाचे आपण स्वागत करतो, तसेच पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित सुरू होतील, अशी अपेक्षा आहे, असे पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष शंकरराव वरगट यांनी सांगितले.