शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीटाकळीची पाणी समस्या सुटणार!

By admin | Updated: July 3, 2017 01:31 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशाने रखडलेली पाणीपुरवठा योजना लागणार मार्गी!

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : येथील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचातयचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने रखडली होती. याविषयी गावातील नजमअली खान नसीमअली खान यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने रखडलेली पाणीपुरवठा योजना एका वर्षात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे. बार्शीटाकळी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सन २०१० ला ग्रामपंचायतने मासिक सभेत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत काम मंजूर व्हावे, याकरिता ठराव मंजूर केला होता, तसेच पहिल्या आमसभेमध्ये याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. या गावाकरिता १२ कोटी ९० लाख रुपयांची योजना मंजूर झाली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने गावात सर्वेक्षण जागासुद्धा निश्चित केली होती. यापैकी नऊ कोटी रुपये आरक्षित ठेवले होते. शासनाने १ आॅगस्ट २०१५ रोजी बार्शीटाकळी ग्रामपंचायत रद्द करून नगरपंचायत जाहीर केली होती. ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्याने पाणीपुरवठा योजना रखडली होती. हिवाळी अधिवेशनात ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणली होती. त्यांनी पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत बार्शीटाकळी ग्रामपंचायतच कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून बार्शीटाकळीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर केले होते, त्यामुळे मंजूर होऊनही योजनेचे काम बंद पडले आहे. याविषयी नजमअली खान नसीमअली खान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने एक वर्षाच्या आत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.कायमस्वरूपी पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन उपसरपंच सविता शंकरराव वरगट, जि.प. सदस्य रेहानाबी आलमगीर खान, बार्शीटाकळी पंचायत समितीचे उपसभापती सैयद फारुख सैयद मुश्ताक, डॉ.मुदस्सीर खान, हाजी सैयद नकीम, सै.इमदाद गाजीखान आदी प्रयत्न करीत आहेत. न्यायालयाच्या निकालाचे आपण स्वागत करतो, तसेच पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित सुरू होतील, अशी अपेक्षा आहे, असे पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष शंकरराव वरगट यांनी सांगितले.