शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

बार्शीटाकळीची पाणी समस्या सुटणार!

By admin | Updated: July 3, 2017 01:31 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशाने रखडलेली पाणीपुरवठा योजना लागणार मार्गी!

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : येथील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचातयचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने रखडली होती. याविषयी गावातील नजमअली खान नसीमअली खान यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने रखडलेली पाणीपुरवठा योजना एका वर्षात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे. बार्शीटाकळी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सन २०१० ला ग्रामपंचायतने मासिक सभेत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत काम मंजूर व्हावे, याकरिता ठराव मंजूर केला होता, तसेच पहिल्या आमसभेमध्ये याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. या गावाकरिता १२ कोटी ९० लाख रुपयांची योजना मंजूर झाली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने गावात सर्वेक्षण जागासुद्धा निश्चित केली होती. यापैकी नऊ कोटी रुपये आरक्षित ठेवले होते. शासनाने १ आॅगस्ट २०१५ रोजी बार्शीटाकळी ग्रामपंचायत रद्द करून नगरपंचायत जाहीर केली होती. ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्याने पाणीपुरवठा योजना रखडली होती. हिवाळी अधिवेशनात ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणली होती. त्यांनी पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत बार्शीटाकळी ग्रामपंचायतच कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून बार्शीटाकळीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर केले होते, त्यामुळे मंजूर होऊनही योजनेचे काम बंद पडले आहे. याविषयी नजमअली खान नसीमअली खान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने एक वर्षाच्या आत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.कायमस्वरूपी पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन उपसरपंच सविता शंकरराव वरगट, जि.प. सदस्य रेहानाबी आलमगीर खान, बार्शीटाकळी पंचायत समितीचे उपसभापती सैयद फारुख सैयद मुश्ताक, डॉ.मुदस्सीर खान, हाजी सैयद नकीम, सै.इमदाद गाजीखान आदी प्रयत्न करीत आहेत. न्यायालयाच्या निकालाचे आपण स्वागत करतो, तसेच पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित सुरू होतील, अशी अपेक्षा आहे, असे पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष शंकरराव वरगट यांनी सांगितले.