शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
2
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
3
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
4
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
5
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
6
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
7
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
8
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
9
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
10
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
11
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
12
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
13
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
15
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
16
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
17
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
18
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
19
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
20
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले

तापमानात वाढ झाल्याने केळीची बाग सुकली!

By admin | Updated: May 23, 2016 01:43 IST

सौंदळा परिसरातील अनेक गावांमधील शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान.

सौंदळा (जि. अकोला) : सध्या मे अखेरीस तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सौंदळा परिसरातील बादखेड, वारखेड, वारी, कार्ला व सोनवाडी या गावांच्या शिवारातील अनेक बागायतदार शेतकर्‍यांच्या शेतातील केळीचे उभे पीक अक्षरश: सुकले आहे. यामुळे या बागायतदार शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सौंदळा परिसरातील अनेक गावांमध्ये वान धरणामुळे जलसमृद्धी आली आहे. या भागातील शेतकरी रोखीचे असलेले केळीचे व अन्य रोखीची पिके घेतात. यापैकी बादखेड, वारखेड, वारी, कार्ला, सोनवाडी येथील शेतकर्‍यांच्या शेतात उभ्या असलेल्या केळीच्या पिकाला ९ मे रोजी आलेल्या वादळी वार्‍याचा फटका बसून काही शेतातील केळीचे पीक उद्ध्वस्त होऊन शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्याबाबत तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार कृषी विभागाने सर्वेक्षण केले आहे. परंतु, अद्यापपर्यंंत संबंधित शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही. त्या घटनेनंतर परिसरात तापमानात कमालीची वाढ होऊन शेतकर्‍यांच्या शेतातील केळीचे पीक सुकणे सुरू झाले. मागील १२ दिवसांत अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील केळीचे पीक मोठय़ा प्रमाणात सुकले आहे. अशाप्रकारे आधी वादळी वार्‍यांमुळे व नंतर भीषण तापमानाने केळी उत्पादक शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा या नुकसानाचे देखील शासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत व पीक विम्याची रक्कम तातडीने देण्याबाबत कार्यवाही करावी.जेणेकरून शेतकर्‍यांना खरिपाच्या पेरणीसाठी ती रक्कम कामी पडू शकेल, अशी केळी उत्पादक शेतकर्‍यांची मागणी आहे.