शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

बोगस केळी रोप प्रकरणात ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:38 IST

अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना केळीची बोगस रोपे देणार्‍या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 

ठळक मुद्देलोकमतचा पाठपुरावा  शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशइंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश अकोटकर यांना ग्राहक मंचाने ठरवले दोषी

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना केळीची बोगस रोपे देणार्‍या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अकोटसह आंबोडा, बोर्डी येथील शेतकर्‍यांना इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक  रमेश अकोटकर आणि त्यांचे एजंट चंद्रकांत श्रीराम पालखडे व दिलीप सुखदेवराव अकोटकर यांनी शेतकर्‍यांना इंद्रायणी जी-९ या जातीचे दज्रेदार, देशातील पहिल्या क्रमाकांचे केळी टिश्यु कल्चर असल्याचे  सांगितले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी या रोपांची खरेदी केली होती. ही खरेदी करत असताना शेतकर्‍यांना विविध कंपन्यांच्या पावत्या देण्यात आल्या. शेतकर्‍यांनी शेती मशागत करून शेणखत, सेंद्रिय खत व इतर खर्च करून या रोपांची पेरणी केली होती. योग्य मशागत करूनही पिके चांगली आली नसल्याने शेतकर्‍यांनी इंद्रायणीचे संचालक व एजंट यांना शेतात येऊन मोकापाहणी करण्याची मागणी केली; मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शेतकर्‍यांनी कृषिमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, उपविभागीय अधिकारी आदींसह इतरांना निवेदन दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासन व प्रशासनाने तक्रार निवारण समितीची नियुक्ती केली होती. यामध्ये ५ कृषी तज्ज्ञ सदस्यांचाही समावेश होता. या समितीने प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन मोका पाहणी केली होती. तसेच त्यामध्ये शेतकर्‍यांचे ७0 टक्के केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला होता. या प्रकरणी शेतकर्‍यांनी ग्राहक मंचातही धाव घेतली होती. शेतकर्‍यांच्या याचिकेवर सुनावणी करीत ग्राहक मंचाने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना दोषी ठरवून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ३0 हजार व न्यायालयनीन खर्च ३ हजर असा ३३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत ही रक्कम शेतकर्‍यांना द्यावी लागणार आहे. रक्कम अदा न केल्यास ८ टक्के दराने व्याजदर लावावा, असेही ग्राहक मंचाच्या त्रिसदस्यीय पीठाने आपल्या निकालात म्हटले आहे. या प्रकरणी तक्रारकर्त्या शेतकर्‍यांच्या वतीने अँड. रवींद्र पोटे व अँड.एस.बी. पाटील यांनी काम पाहिले.