शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

बोगस केळी रोप प्रकरणात ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:38 IST

अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना केळीची बोगस रोपे देणार्‍या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 

ठळक मुद्देलोकमतचा पाठपुरावा  शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशइंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश अकोटकर यांना ग्राहक मंचाने ठरवले दोषी

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना केळीची बोगस रोपे देणार्‍या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अकोटसह आंबोडा, बोर्डी येथील शेतकर्‍यांना इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक  रमेश अकोटकर आणि त्यांचे एजंट चंद्रकांत श्रीराम पालखडे व दिलीप सुखदेवराव अकोटकर यांनी शेतकर्‍यांना इंद्रायणी जी-९ या जातीचे दज्रेदार, देशातील पहिल्या क्रमाकांचे केळी टिश्यु कल्चर असल्याचे  सांगितले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी या रोपांची खरेदी केली होती. ही खरेदी करत असताना शेतकर्‍यांना विविध कंपन्यांच्या पावत्या देण्यात आल्या. शेतकर्‍यांनी शेती मशागत करून शेणखत, सेंद्रिय खत व इतर खर्च करून या रोपांची पेरणी केली होती. योग्य मशागत करूनही पिके चांगली आली नसल्याने शेतकर्‍यांनी इंद्रायणीचे संचालक व एजंट यांना शेतात येऊन मोकापाहणी करण्याची मागणी केली; मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शेतकर्‍यांनी कृषिमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, उपविभागीय अधिकारी आदींसह इतरांना निवेदन दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासन व प्रशासनाने तक्रार निवारण समितीची नियुक्ती केली होती. यामध्ये ५ कृषी तज्ज्ञ सदस्यांचाही समावेश होता. या समितीने प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन मोका पाहणी केली होती. तसेच त्यामध्ये शेतकर्‍यांचे ७0 टक्के केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला होता. या प्रकरणी शेतकर्‍यांनी ग्राहक मंचातही धाव घेतली होती. शेतकर्‍यांच्या याचिकेवर सुनावणी करीत ग्राहक मंचाने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना दोषी ठरवून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ३0 हजार व न्यायालयनीन खर्च ३ हजर असा ३३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत ही रक्कम शेतकर्‍यांना द्यावी लागणार आहे. रक्कम अदा न केल्यास ८ टक्के दराने व्याजदर लावावा, असेही ग्राहक मंचाच्या त्रिसदस्यीय पीठाने आपल्या निकालात म्हटले आहे. या प्रकरणी तक्रारकर्त्या शेतकर्‍यांच्या वतीने अँड. रवींद्र पोटे व अँड.एस.बी. पाटील यांनी काम पाहिले.