शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बोगस केळी रोप प्रकरणात ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:38 IST

अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना केळीची बोगस रोपे देणार्‍या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 

ठळक मुद्देलोकमतचा पाठपुरावा  शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशइंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश अकोटकर यांना ग्राहक मंचाने ठरवले दोषी

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना केळीची बोगस रोपे देणार्‍या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अकोटसह आंबोडा, बोर्डी येथील शेतकर्‍यांना इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक  रमेश अकोटकर आणि त्यांचे एजंट चंद्रकांत श्रीराम पालखडे व दिलीप सुखदेवराव अकोटकर यांनी शेतकर्‍यांना इंद्रायणी जी-९ या जातीचे दज्रेदार, देशातील पहिल्या क्रमाकांचे केळी टिश्यु कल्चर असल्याचे  सांगितले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी या रोपांची खरेदी केली होती. ही खरेदी करत असताना शेतकर्‍यांना विविध कंपन्यांच्या पावत्या देण्यात आल्या. शेतकर्‍यांनी शेती मशागत करून शेणखत, सेंद्रिय खत व इतर खर्च करून या रोपांची पेरणी केली होती. योग्य मशागत करूनही पिके चांगली आली नसल्याने शेतकर्‍यांनी इंद्रायणीचे संचालक व एजंट यांना शेतात येऊन मोकापाहणी करण्याची मागणी केली; मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शेतकर्‍यांनी कृषिमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, उपविभागीय अधिकारी आदींसह इतरांना निवेदन दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासन व प्रशासनाने तक्रार निवारण समितीची नियुक्ती केली होती. यामध्ये ५ कृषी तज्ज्ञ सदस्यांचाही समावेश होता. या समितीने प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन मोका पाहणी केली होती. तसेच त्यामध्ये शेतकर्‍यांचे ७0 टक्के केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला होता. या प्रकरणी शेतकर्‍यांनी ग्राहक मंचातही धाव घेतली होती. शेतकर्‍यांच्या याचिकेवर सुनावणी करीत ग्राहक मंचाने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना दोषी ठरवून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ३0 हजार व न्यायालयनीन खर्च ३ हजर असा ३३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत ही रक्कम शेतकर्‍यांना द्यावी लागणार आहे. रक्कम अदा न केल्यास ८ टक्के दराने व्याजदर लावावा, असेही ग्राहक मंचाच्या त्रिसदस्यीय पीठाने आपल्या निकालात म्हटले आहे. या प्रकरणी तक्रारकर्त्या शेतकर्‍यांच्या वतीने अँड. रवींद्र पोटे व अँड.एस.बी. पाटील यांनी काम पाहिले.