शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाच्या पुनर्गठनाकडे बँकांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 03:08 IST

सव्वा लाखावर शेतक-यांच्या कर्जाचे १५ मेपर्यंत पुनर्गठनावर प्रश्नचिन्ह.

अकोला: दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, पीक कर्ज पुनर्गठनाच्या कामात बँकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे १५ मेपर्यंत जिल्हय़ातील १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्ज थकीत असलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, यावर्षीच्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गत २६ एप्रिल रोजी घेतला. कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे १५ मे पर्यंंत पुनर्गठन करावयाचे निर्देश आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे तातडीने पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज वाटप करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेमार्फत जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँक व संबंधित बँकांना २८ एप्रिल रोजी देण्यात आले. त्यानुसार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, याबाबतची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने १0 मे पर्यंत जिल्हय़ात पीक कर्ज पुनर्गठनाचे काम केवळ २0 टक्क्यावर पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज पुनर्गठनाच्या कामाकडे बँकांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने पाच दिवसात (१५ मेपर्यंंत ) जिल्हय़ातील सर्व १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करण्याच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.