शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

पीक कर्जाच्या पुनर्गठनाकडे बँकांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 03:08 IST

सव्वा लाखावर शेतक-यांच्या कर्जाचे १५ मेपर्यंत पुनर्गठनावर प्रश्नचिन्ह.

अकोला: दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, पीक कर्ज पुनर्गठनाच्या कामात बँकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे १५ मेपर्यंत जिल्हय़ातील १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्ज थकीत असलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, यावर्षीच्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गत २६ एप्रिल रोजी घेतला. कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे १५ मे पर्यंंत पुनर्गठन करावयाचे निर्देश आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे तातडीने पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज वाटप करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेमार्फत जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँक व संबंधित बँकांना २८ एप्रिल रोजी देण्यात आले. त्यानुसार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, याबाबतची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने १0 मे पर्यंत जिल्हय़ात पीक कर्ज पुनर्गठनाचे काम केवळ २0 टक्क्यावर पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज पुनर्गठनाच्या कामाकडे बँकांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने पाच दिवसात (१५ मेपर्यंंत ) जिल्हय़ातील सर्व १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करण्याच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.