शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पीक कर्जाच्या पुनर्गठनाकडे बँकांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 03:08 IST

सव्वा लाखावर शेतक-यांच्या कर्जाचे १५ मेपर्यंत पुनर्गठनावर प्रश्नचिन्ह.

अकोला: दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, पीक कर्ज पुनर्गठनाच्या कामात बँकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे १५ मेपर्यंत जिल्हय़ातील १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्ज थकीत असलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, यावर्षीच्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गत २६ एप्रिल रोजी घेतला. कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे १५ मे पर्यंंत पुनर्गठन करावयाचे निर्देश आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे तातडीने पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज वाटप करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेमार्फत जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँक व संबंधित बँकांना २८ एप्रिल रोजी देण्यात आले. त्यानुसार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, याबाबतची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने १0 मे पर्यंत जिल्हय़ात पीक कर्ज पुनर्गठनाचे काम केवळ २0 टक्क्यावर पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज पुनर्गठनाच्या कामाकडे बँकांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने पाच दिवसात (१५ मेपर्यंंत ) जिल्हय़ातील सर्व १ लाख ३३ हजार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करण्याच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.