शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

नोटबंदीच्या धक्क्यातून सावरू लागले आर्थिक व्यवहार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:50 IST

काळा पैसा बाहेर काढला जाईल, कॅशलेसचे प्रमाण वाढेल, अशा अनेक उद्देशाने केलेल्या नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेला काही काळ धक्का बसला. आता वर्षपूर्तीनंतर हळूहळू सर्व क्षेत्रातील व्यवहार सुरळीत होत असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देनोटबंदीची वर्षपूर्ती अजूनही अनेक क्षेत्रांमध्ये धक्का कायमच 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी केलेल्या एका घोषणेमुळे अनेकांची धावपळ उडाली. पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रांच्या बाहेर मोठय़ा रांगा लागल्या. पेट्रोल पंपांवर चलनातून बाद केलेल्या नोटा स्वीकारण्यासाठी मुदत दिल्यामुळे लोकांनी गाड्यांमध्ये पेट्रोल भरून घेण्यासाठी एकच झुंबड केली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मालमत्ता कर व वीज बिलाचा भरणा करण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांसह महावितरणची रेकॉर्ड ब्रेक वसुली झाली. नोटबंदीच्या घोषणोनंतरचे हे चित्र होते; मात्र याची चर्चा नोटबंदीच्या वर्षपूर्तीनंतरही कायमच आहे. काळा पैसा बाहेर काढला जाईल, कॅशलेसचे प्रमाण वाढेल, अशा अनेक उद्देशाने केलेल्या नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेला काही काळ धक्का बसला. आता वर्षपूर्तीनंतर हळूहळू सर्व क्षेत्रातील व्यवहार सुरळीत होत असल्याचे चित्र आहे. नोटबंदीनंतर गावपातळीपासून कॅशलेस व्यवहार सुरू होतील, असे सरकारला अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात कॅशलेसचे प्रमाण अपेक्षेनुरूप वाढलेच नाही.  दैनंदिन व्यवहार मोठय़ा प्रमाणात रोखीतच चालतात.  अकोल्यात हुंडीचिठ्ठीची मोठी बाजारपेठ आहे, याचा पूर्ण व्यवहार रोखीतच चालतो. मात्र, पूर्वीसारखी कॅश आता बँकांमधून मिळत नसल्याने रोख बाजारपेठ खिळखिळी झाली आहे. त्यामुळे रोख बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे.

नोटबंदी नेमकी खरीप हंगाम पिकांची काढणी आणि रब्बी पिकांच्या पेरणीच्या तोंडावर झाल्याने ग्रामीण, शेती अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. शेतमाल खरेदी-विक्रीवर परिणाम झाला. खरीप पिके काढणी, रब्बी पेरणी रखडली होती. आजही शेतकरी त्यातून पूर्णत: सावरला नाही.

टॅग्स :Note Banनोटाबंदी