शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

घरकुलासाठी लाभार्थी बनले कर्जबाजारी !

By admin | Updated: May 16, 2014 21:42 IST

ग्रामीण भागात गवंडीकामाचे भाव वाढल्याने कमी पैशात घरकुल बांधून देणारे मिळेनासे झाले आहेत.

करतखेडा (अकोला):निराधार व दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना अंमलात आणली आहे. परंतु आता घरकुलाचे स्वप्न साकार होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत. ग्रामीण भागात गवंडीकामाचे भाव वाढल्याने कमी पैशात घरकुल बांधून देणारे मिळेनासे झाले आहेत. इंदिरा आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायतने ३२ घरकुलांना मंजुरात दिली आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना दोन टप्प्यात ७० हजार रुपये मिळालेत. २५ हजारांचा तिसरा टप्पा बाकी आहे. घरकुलाचे बांधकाम सुरू आहेत; परंतु दोन खोल्याचे बांधकाम करण्यासाठी गवंडी ५५ ते ६५ हजार रुपये मागत आहेत. गरीब लोकांना घरकुलाच्या बांधकामाचे मोजमाप न समजल्याने लाभार्थी संकटात सापडले आहेत. अर्धवट काम राहील, या भीतीने लाभार्थी हातउसणे करू न पैसा उभा करीत आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ लाभार्थींवर आली आहे. ग्रामीण भागात बहुतांश गावामध्ये हीच स्थिती आहे. घरकुलासाठी मिळणारी रक्कम वाढवून दिल्यास लाभार्थींना या योजनेला लाभ घेता येईल. पैसा नसल्यामुळे अनेकांचे काम अर्धवट स्थितीत अडकले आहे. घरकुलाच्या कामासाठी उसणे दिलेले पैसे लाभार्थी परत करणार नाही, अशी भीती असल्यामुळे कोणीही पैसे देण्यास धजावत नाही. इंदिरा आवास योजनेचा खर्‍या अर्थाने लाभ गरिबांच्या पदरात पडत नाही, हे सत्य आहे. काही गावांमध्ये श्रीमंती लोकांनाही घरकुल मंजूर झालीत. त्यांनी शौचालयाचे थातूरमातूर काम करू न अनुदानाचा लाभ घेतला. मात्र खरे लाभार्थी अनेक गावात वंचित आहेत. घरकुल वाटपाच्या यादीत मोठ्या प्रमाणात राजकारण झाल्यामुळे अनेक गावात लाभार्थींना फटका बसला आहे. करतखेडा येथे नियमानुसारच घरकुलाचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले. या योजनेचा लाभ खर्‍या लोकांना मिळावा व गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यासाठी शासनाने जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी, अशी मागणी जोर धरत आहे.