शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

घरकुलासाठी लाभार्थी बनले कर्जबाजारी !

By admin | Updated: May 16, 2014 21:42 IST

ग्रामीण भागात गवंडीकामाचे भाव वाढल्याने कमी पैशात घरकुल बांधून देणारे मिळेनासे झाले आहेत.

करतखेडा (अकोला):निराधार व दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना अंमलात आणली आहे. परंतु आता घरकुलाचे स्वप्न साकार होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत. ग्रामीण भागात गवंडीकामाचे भाव वाढल्याने कमी पैशात घरकुल बांधून देणारे मिळेनासे झाले आहेत. इंदिरा आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायतने ३२ घरकुलांना मंजुरात दिली आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना दोन टप्प्यात ७० हजार रुपये मिळालेत. २५ हजारांचा तिसरा टप्पा बाकी आहे. घरकुलाचे बांधकाम सुरू आहेत; परंतु दोन खोल्याचे बांधकाम करण्यासाठी गवंडी ५५ ते ६५ हजार रुपये मागत आहेत. गरीब लोकांना घरकुलाच्या बांधकामाचे मोजमाप न समजल्याने लाभार्थी संकटात सापडले आहेत. अर्धवट काम राहील, या भीतीने लाभार्थी हातउसणे करू न पैसा उभा करीत आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ लाभार्थींवर आली आहे. ग्रामीण भागात बहुतांश गावामध्ये हीच स्थिती आहे. घरकुलासाठी मिळणारी रक्कम वाढवून दिल्यास लाभार्थींना या योजनेला लाभ घेता येईल. पैसा नसल्यामुळे अनेकांचे काम अर्धवट स्थितीत अडकले आहे. घरकुलाच्या कामासाठी उसणे दिलेले पैसे लाभार्थी परत करणार नाही, अशी भीती असल्यामुळे कोणीही पैसे देण्यास धजावत नाही. इंदिरा आवास योजनेचा खर्‍या अर्थाने लाभ गरिबांच्या पदरात पडत नाही, हे सत्य आहे. काही गावांमध्ये श्रीमंती लोकांनाही घरकुल मंजूर झालीत. त्यांनी शौचालयाचे थातूरमातूर काम करू न अनुदानाचा लाभ घेतला. मात्र खरे लाभार्थी अनेक गावात वंचित आहेत. घरकुल वाटपाच्या यादीत मोठ्या प्रमाणात राजकारण झाल्यामुळे अनेक गावात लाभार्थींना फटका बसला आहे. करतखेडा येथे नियमानुसारच घरकुलाचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले. या योजनेचा लाभ खर्‍या लोकांना मिळावा व गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यासाठी शासनाने जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी, अशी मागणी जोर धरत आहे.