शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी बँकांची टोलवाटोलवी

By admin | Updated: May 8, 2015 01:45 IST

अकोला जिल्ह्यातील कर्जदार शेतक-यांना हेलपाटे.

संतोष येलकर/ अकोला: दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षांंसाठी पुनर्गठन करून, त्यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असला तरी, याबाबतचा आदेश प्रा प्त झाला नसल्याचे सांगत कर्जदार शेतकर्‍यांनी यापूर्वी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यास जिल्हय़ात बँकांकडून टोलवाटोलवी करण्यात येत आहे. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँकांमध्ये जाणार्‍या जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला. या पृष्ठभूमीवर २0१४-१५ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पाच वर्षांंसाठी पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्‍यांना यावर्षी पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत ७ एप्रिल रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षांंंसाठी पुनर्गठन करून, त्यांना यावर्षी पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी १३ व २६ एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील सर्व २९ राष्ट्रीयीकृत बँकांना दिले. परंतु, कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेकडून अद्याप सुरू करण्यात आले नाही. तसेच कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत कोणताही निर्णय किंवा आदेश प्राप्त झाला नसल्याचे काही राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जदार शेतकर्‍यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पाच वर्षांंसाठी पुनर्गठन करण्याच्या कामात जिल्ह्यातील बँकांकडून टोलवाटोलवी केली जात असून, कर्जाचे पुनर्गठन व पुन्हा कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांमध्ये जाणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.