शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

केळी पिकाला उन्हाचा फटका!

By admin | Updated: March 5, 2016 02:27 IST

विदर्भात वाढत्या तापमानाने उत्पादनावर परिणाम.

खामगाव: सध्या उन्हाची तीव्रता वाढली असल्याने केळी पिकाला फटका बसतोय. शेतकर्‍यांनी जिवापाड जपलेले हे पीक सध्या उन्हाच्या झळांनी होरपळत असून, याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे.राज्यात ४४ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे. त्यापैकी निम्मे क्षेत्र हे जळगाव जिल्ह्यात आहे. केळीच्या पिकासाठी हा जिल्हा प्रसिद्ध असला तरी पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, चिखली, देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील आकोट, पातूर, तेल्हारा, बाश्रीटाकळी, अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी, परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार या ठिकाणांसह यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये केळीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. काही वर्षांपूर्वी जमिनीतील पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्यामुळे केळी पिकाकडे शेतकर्‍यांचा कल होता; मात्र गत तीन वर्षांत पर्जन्यमान घटल्याने जलपातळी खोल गेली आणि केळीच्या लागवडीवर विपरीत परिणाम झाला. उन्हाळ्याची चाहूल आता लागली असून, दुपारचे उन्ह केळी पिकाला उद्ध्वस्त करू पाहतेय. विदर्भात जेमतेम उन्हाळा सुरू होत असताना तापमान साधारणत: ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याने उष्ण वारे, तीव्र सूर्यप्रकाश यामुळे केळीच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहेत. सध्या फळाची साल पिवळी पडणे, फणीतून केळी गळून पडणे, उष्ण हवेमुळे पाने फाटणे हे दुष्परिणाम पाहावयास मिळत आहेत. तापमान ४0 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास झाडाची वाढ खुंटणे यांसह अनेक विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आधीच पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्यातच उत्पन्नात घट झाल्यास उत्पादनखर्च निघेल की नाही, ही समस्या शेतकर्‍यांसमोर ह्यआह्ण वासून उभी आहे.