शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

केळी पिकाला उन्हाचा फटका!

By admin | Updated: March 5, 2016 02:27 IST

विदर्भात वाढत्या तापमानाने उत्पादनावर परिणाम.

खामगाव: सध्या उन्हाची तीव्रता वाढली असल्याने केळी पिकाला फटका बसतोय. शेतकर्‍यांनी जिवापाड जपलेले हे पीक सध्या उन्हाच्या झळांनी होरपळत असून, याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे.राज्यात ४४ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे. त्यापैकी निम्मे क्षेत्र हे जळगाव जिल्ह्यात आहे. केळीच्या पिकासाठी हा जिल्हा प्रसिद्ध असला तरी पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, चिखली, देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील आकोट, पातूर, तेल्हारा, बाश्रीटाकळी, अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी, परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार या ठिकाणांसह यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये केळीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. काही वर्षांपूर्वी जमिनीतील पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्यामुळे केळी पिकाकडे शेतकर्‍यांचा कल होता; मात्र गत तीन वर्षांत पर्जन्यमान घटल्याने जलपातळी खोल गेली आणि केळीच्या लागवडीवर विपरीत परिणाम झाला. उन्हाळ्याची चाहूल आता लागली असून, दुपारचे उन्ह केळी पिकाला उद्ध्वस्त करू पाहतेय. विदर्भात जेमतेम उन्हाळा सुरू होत असताना तापमान साधारणत: ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याने उष्ण वारे, तीव्र सूर्यप्रकाश यामुळे केळीच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहेत. सध्या फळाची साल पिवळी पडणे, फणीतून केळी गळून पडणे, उष्ण हवेमुळे पाने फाटणे हे दुष्परिणाम पाहावयास मिळत आहेत. तापमान ४0 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास झाडाची वाढ खुंटणे यांसह अनेक विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आधीच पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्यातच उत्पन्नात घट झाल्यास उत्पादनखर्च निघेल की नाही, ही समस्या शेतकर्‍यांसमोर ह्यआह्ण वासून उभी आहे.