शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

गैरव्यवहारातील अधिकारी, कर्मचा-यांवर उगारणार बडगा

By admin | Updated: September 28, 2015 02:09 IST

वरिष्ठ अधिका-यांकडून कारवाई करताना होणारी चालढकल पाहता अशा अधिका-यांवरही आता शासनाने कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे.

किशोर खैरे/ नांदुरा(जि.बुलडाणा): सरकारी कार्यालयातील गैरकारभार, लाच प्रकरणातील कर्मचार्‍यांवर वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कारवाई करताना कथित स्तरावर केली जाणारी चालढकल पाहता अशा अधिकार्‍यांवरही आता शासनाने प्रसंगी कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे आता अधीनस्त कर्मचार्‍याला कारवाईपासून वरिष्ठ वाचवू शकणार नाहीत. सरकारी कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपत प्रकरणात, फसवणूक किंवा गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकल्याचे चौकशीत आढळून आल्यास त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार होते. प्रकरण न्यायालयात जाऊन तो दोषी आढळल्यास त्याच्यावर विनाविलंब कारवाईची तरतूद नियमात आहे; मात्र प्रकरणी कार्यवाही करताना प्रसंगी चालढकल झाल्याचे काही प्रकरणात शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जुलै २0१५ मध्ये एक निर्णय घेऊन अशा प्रकरणात थेट कारवाईचा बडगा उचलण्याचे संकेत दिले आहेत. सरकारी कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपत, फसवणूक किंवा गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकल्याचे चौकशीत आढळून आल्यानंतर त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली जाते. प्रकरण न्यायप्रविष्ट होऊन स्थानिक न्यायालयात त्याच्या विरोधात आरोप सिद्ध झाल्यास शिस्तभंगाची कारवाई अपेक्षित असते. अशा काही प्रकरणात कार्यवाही करताना मध्यंतरी दिरंगाई झाल्याचे समोर आले होते; पण आता तसे होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फौजदारी प्रकरणातील सुनावणीच्या तारखेला न्यायालयात उपस्थित राहून अशा प्रकरणाची सरकार वकिलाकडून माहिती आता वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे. न्यायालयाने कर्मचार्‍याला दोषी ठरविले असेल तर आदेशाची प्रत प्राप्त करून संबंधित कर्मचार्‍याने वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याच्या मुदतीच्या आधीच कर्मचार्‍यावरील कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करावा लागणार आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला तत्काळ वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली असेल तर त्यावरील सुनावणीची वाट न पाहता कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन कारवाईची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. लाचखोरीच्या प्रकरणात कर्मचार्‍यावरील आरोप सिद्ध झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यापूर्वी त्याने वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली आहे किंवा नाही, हे तपासणे आवश्यक राहणार आहे. वरिष्ठ न्यायालयाने कर्मचार्‍याच्या शिक्षेला स्थगिती दिली नसेल तर संबंधित दोषी कर्मचार्‍यावर कारवाई करणे बंधनकारक आहे. परंतु अनेक कार्यालयात वरिष्ठ अधिकारी दोषी कर्मचार्‍याप्रती सहानुभूती दाखवून बर्‍याचदा कार्यवाही करण्याचे टाळत असल्याची प्रकरणे समोर आली होती. त्यावर राज्याच्या समान्य प्रशासन विभागाने जुलै २0१५ मध्ये हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी बर्‍याच प्रकरणात खोट्या तक्रारी झाल्याचे निदर्शनास आले असून संपूर्ण शहानिशा क रूनच या प्रकरणी कार्यवाही केली जात असल्याचे स्पष्ट केले.