शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

मागासवर्गीयांचा लोकसंख्येनुसार मंत्रीमडळात सहभाग असावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 13:59 IST

अकोला : मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या आधारावर राज्यसभा, विधान परिषद तसेच मंत्रीमंडळात वाटा असावा तसेच सैन्य दल,खेळात आरक्षण देण्यात यावे यासाठीचे आपले प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देकेंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादनअकोल्यात घेतली पत्रकार परिषद

अकोला : मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या आधारावर राज्यसभा, विधान परिषद तसेच मंत्रीमंडळात वाटा असावा तसेच सैन्य दल,खेळात आरक्षण देण्यात यावे यासाठीचे आपले प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री यांनी शनिवारी येथे केले.केंद्रीय मंत्रीमंडळात सहभागी झाल्यांनतर प्रथम आठवले अकोला दौºयावर आले आहेत. अकोला जिल्हा रिपाइंच्यावतीने त्यांच्या नागरीसत्काराचे येथे आयोजन करण्यात आले. याप्रंसगी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय खात्याचे राज्य मंत्री म्हणून त्यांच्या खात्याशी संबधीत योजना व आतापर्यत केलेल्या कामाची माहिती दिली. सद्या विद्यार्थ्यांना मिळणाºया भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचा विषय गाजत आहे. या अनुषगांने बोलताना त्यांनी महाराष्टÑातील विद्यार्थ्यांचे ५०४ कोटी रू पये पाठवले असल्याचे सांगितले. माझ्या खात्याशी संबंधित कामे मी करतोच; पण मी राज्यमंत्री आहे. त्यामुळे मला तेवढे अधिकार नाहीत, मी केवळ शिफारस करू शकतो,अशी पुष्टी त्यांनी जोडली.मागासवर्गीय कर्मचाºयांना बढतीमध्ये आरक्षणाचा मुद्यावर एका प्रश्नादाखल त्यांनी हा प्रश्न न्यायप्रवीष्ठ असल्याचे सांगताना, उच्चन्यायालयाच्या निर्णयावर राज्यसरकार सर्वोच्च न्यायालयात जणार असल्याते म्हणाले. पण अशी पाळीच येवू नये म्हणून संसदेत कायदाच करण्यात यावा,यासाठीचे माझे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.रिपब्लीकन ऐक्याच्यासंदर्भात बोलताना त्यांनी ऐक्य ही काळाची गरज असल्याचे सांगताना, यापुढे जे ऐक्यात ऐणार नाहीत त्या नेत्यांना आंबेडकरी जनतेनेच जिल्हाबंदी घालण्याची गरज आहे. ऐक्यात भारिप-बमंसचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबडेकरांची अनुत्सुकता असल्याची मिश्किल टीकाही त्यांनी केली. १९९५ मध्ये झालेल्या रिपब्लिकन ऐक्याच्या मागे काँग्रेस चे नेते सिताराम केसरी, तथा शरद पवारांची भूमीका महत्वाची होती असे वाशिम येथे आयोजित सभेत अ‍ॅड. आंबेडकर बोलले होते.याचा आठवले यांनी इन्कार केला. हे ऐक्य आंबेडकरी समाज व जनतेच्या रेट्यामुळेच झाल्याचे ते म्हणाले.गुजरातमध्ये रिपाइंचा उमेदवार देणार नाहीगुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी भाजपाच बहुमताने येईल असा दावा केला असून,मागासवर्गीयांच्या पाठींब्यासाठी गुजरातमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मताची विभागणी टाळण्यासाठी गुजरात व हिमाचलमध्ये रिपाइं उमेदवार देणार नसल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. २०१९मध्येही भाजपाच केंद्रात सत्तेत येईल त्यावेळी आपण कॅबीनेटमंत्री असू असेही त्यांनी एका प्रश्नादाखल सांगितले. माझा पक्षा सत्तेवर अवलंबून नाही पण पक्ष मजबूत करायचा असेल कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा हवाय, सद्या राज्यात महामंडळेच जाहीर झाली नाहीत त्यामुळे त्यांनाच नाही तर आपणास काय मिळणार असेही ते म्हणाले.मायावतींवरही टीकामागासवर्गीयावरील अत्याचार न थांबल्यास बौध्द धम्म स्विकारणार असल्याची धमकी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दिली,या प्रश्नादाखल त्यांनी मायावती बौध्द होणार नाहीत, हे त्याचे नाटक असल्याची टीका केली. मायावतीच्या सत्तेच्या काळातही मागासवर्गीयावर अन्याय होतच होता.

 

टॅग्स :Politicsराजकारणministerमंत्री