शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादकता वाढीच्या उपाययोजनांवर शेतकऱ्यांचे करणार प्रबोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST

संतोष येलकर......... अकोला : येत्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे प्रबोधन ...

संतोष येलकर.........

अकोला : येत्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यामध्ये पिकांची पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

पीकनिहाय पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुकांमुळे पिकांची उत्पादकता कमी येते. या पार्श्वभूमीवर येत्या खरीप हंगामात पिकांची पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुका टाळणे आणि पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये घरगुती बियाण्याचा वापर करताना उगवण क्षमता व बीज प्रक्रिया न करणे, ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना योग्य अंतरावर व योग्य खोलीवर पेरणी न करणे, शिफारशीनुसार बियाण्याची मात्रा न वापरता जास्तीची मात्रा वापरणे, पेरणी यंत्राने किंवा सरी व वरंबा पद्धतीने पेरणी न करणे, सोयाबीन पिकासाठी गंधकाची आवश्यकता असताना त्याचा वापर न करणे, अनुभव नसलेल्या ट्रॅक्टरचालकाकडून पेरणी यंत्राद्वारे पेरणी करून घेणे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर न करता अनाठायी कीटकनाशकांच्या फवारण्या करणे, आदी प्रकारच्या चुका टाळणे आणि पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. गावनिहाय बैठकांमध्ये संबंधित कृषी सहायकांकडून यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

खरीप हंगामात पीकनिहाय पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुका टाळणे व पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या उपाययोजना करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ एप्रिलपासून गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार असून, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शंकर तोटावार

प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.