शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उत्पादकता वाढीच्या उपाययोजनांवर शेतकऱ्यांचे करणार प्रबोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST

संतोष येलकर......... अकोला : येत्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे प्रबोधन ...

संतोष येलकर.........

अकोला : येत्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यामध्ये पिकांची पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

पीकनिहाय पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुकांमुळे पिकांची उत्पादकता कमी येते. या पार्श्वभूमीवर येत्या खरीप हंगामात पिकांची पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुका टाळणे आणि पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये घरगुती बियाण्याचा वापर करताना उगवण क्षमता व बीज प्रक्रिया न करणे, ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना योग्य अंतरावर व योग्य खोलीवर पेरणी न करणे, शिफारशीनुसार बियाण्याची मात्रा न वापरता जास्तीची मात्रा वापरणे, पेरणी यंत्राने किंवा सरी व वरंबा पद्धतीने पेरणी न करणे, सोयाबीन पिकासाठी गंधकाची आवश्यकता असताना त्याचा वापर न करणे, अनुभव नसलेल्या ट्रॅक्टरचालकाकडून पेरणी यंत्राद्वारे पेरणी करून घेणे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर न करता अनाठायी कीटकनाशकांच्या फवारण्या करणे, आदी प्रकारच्या चुका टाळणे आणि पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. गावनिहाय बैठकांमध्ये संबंधित कृषी सहायकांकडून यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

खरीप हंगामात पीकनिहाय पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुका टाळणे व पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या उपाययोजना करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ एप्रिलपासून गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार असून, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शंकर तोटावार

प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.