शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ऑटोरिक्षा चालकांच्या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल!

By admin | Updated: January 22, 2017 03:09 IST

शुल्कवाढ मागे घेण्यासाठी दिले धरणे.

अकोला, दि. २१- ऑटोरिक्षा चालकांनी शनिवारी छेडलेल्या आंदोलनात्मक पवित्र्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांचे प्रचंड हाल झाले. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यापासून ते घरातून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला ऑटोचालकांच्या आकस्मात आंदोलनाचा फटका बसला.शनिवार हा दिवस अकोलेकरांना प्रचंड अडचणीचा ठरला. चिल्ल्या-पिल्ल्यांना शाळेत घेऊन जाणारा ऑटोवाला न आल्याने, मुलांना शाळेत सोडण्यापासून ते त्यांना घरी आणण्यापर्यंतची कसरत पालकांना करावी लागली.अनेक चाकरमान्यांनी तर मुलांना शाळेत न पाठविण्याचा मार्ग निवडला. तर अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शाळेत उशिरा पोहोचलेल्या पालकांना, बंद झालेल्या प्रवेशद्वारापासून माघारी फिरावे लागले. घराबाहेर पडणार्‍या प्रत्येक चाकरमान्याला ऑटोचालकांच्या बंदचा फटका बसला.घरगुती कामकाजानिमित्त किंवा दैनंदिन कामासाठी परगावी निघालेल्यांचीसुद्धा रेल्वे आणि बसस्थानक गाठताना दमछाक झाली. ऑटोरिक्षा उपलब्ध नसल्यामुळे परगावाहून आलेल्यांनासुद्धा घरापर्यंत रपेट करावी लागली. मुख्य बाजारपेठेतून दररोज भाजी, दूध व अन्य साहित्य विक्रीसाठी घेऊन जाणार्‍यांनी मालवाहू छकडेवाल्यांची मदत घेतली. ऑटो उपलब्ध नसल्यामुळे शहरातील रस्त्यांवर दिवसभर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचीच गर्दी दिसून आली. या बंदमुळे सर्वात जास्त विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना पायी घरी जावे लागले.