शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

ऑटोडीसीआर प्रणाली ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:01 IST

अकोला : इमारत, घरे बांधण्याचा नकाशा मंजूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. केवळ प्रिंटर नादुरुस्त झाल्याच्या सबबीखाली मागील १७ दिवसांपासून ही प्रणाली ठप्प पडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यामुळे नकाशा मंजुरीचे काम थांबले असून, कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 

ठळक मुद्देनकाशा मंजुरीचे काम थांबलेकंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इमारत, घरे बांधण्याचा नकाशा मंजूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. केवळ प्रिंटर नादुरुस्त झाल्याच्या सबबीखाली मागील १७ दिवसांपासून ही प्रणाली ठप्प पडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यामुळे नकाशा मंजुरीचे काम थांबले असून, कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शहरात व्यावसायिक-रहिवासी इमारती असो किंवा घरे बांधण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर करणे क्रमप्राप्त ठरते. नगररचना विभागाकडे नकाशा मंजुरीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर पहिल्यांदा जोत्यापर्यंत (प्लिंथ) बांधकामाची परवानगी दिली जाते. जोत्यापर्यंत बांधकाम पूर्ण केल्यावर पुढील बांधकामासाठी पुन्हा नगररचना विभागाची परवानगी आवश्यक ठरते. यादरम्यान, नकाशा सादर करताना प्लॉटचे क्षेत्रफळ, कृषक-अकृषक असण्यासोबतच शिट क्रमांक आदी इत्थंभूत माहिती कागदोपत्री सादर करावी लागत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे प्रशासनाने नकाशा मंजुरीसाठी ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. ऑटोडीसीआर पद्धतीनुसार ऑनलाइन अर्ज सादर करणे भाग आहे. त्यासाठी मनपाने रीतसर आर्किटेक्ट,अभियंत्यांची निवड केली आहे. ऑटोडीसीआरचा कंत्राट पुणे येथील कंपनीला देण्यात आला आहे. प्रिंटर नादुरुस्त असण्याच्या सबबीखाली मागील १७ दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प पडली आहे. यामुळे गरजू नागरिकांच्या नकाशाची कामे अधांतरी सापडली आहेत. 

नगररचना विभागाचे नियंत्रण नाही!नगररचना विभागाच्या अखत्यारित काम करणार्‍या संबंधित कंपनीवर नगररचना विभागाचे नियंत्रण अपेक्षित आहे. याठिकाणी नेमका उलटा प्रकार दिसून येतो. केवळ एक प्रिंटर नादुरुस्त झाल्याचे कारण दर्शवित कंपनीने मागील १७ दिवसांपासून कार्यालयाचे कामकाज ठप्प केले आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

प्रिंटर नादुरुस्त झाले असेल, तर ते दुसर्‍याच दिवशी बदलणे अपेक्षित होते. १७ दिवसांपासून काम ठप्प असेल, तर कंपनी झोपेत असल्याचे दिसून येते. कंपनीची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. अकोलेकरांना होत असलेल्या मानसिक त्रासाचा कंपनीला खुलासा करावा लागेल. -विजय अग्रवाल, महापौर