शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

घोषणांचा सुकाळ, मदतीचा दुष्काळ!

By admin | Updated: April 7, 2016 01:58 IST

दुष्काळ निधीबाबत प्रशासन संभ्रमात: ९४२ गावे मदतीच्या प्रतीक्षेत.

अकोला: जिल्ह्यातील ९४२ गावांमध्ये २३ मार्च २0१६ च्या शासननिर्णयाप्रमाणे दुष्काळी स्थिती घोषित करण्यात आली; मात्र शासनाकडून दुष्काळ घोषित झाल्यानंतरही दुष्काळी मदतवाटपाबाबत मार्गदर्शक सूचनाच देण्यात आल्या नसल्याने दुष्काळग्रस्तांना मदतवाटप करण्याबाबत जिल्हा प्रशासन संभ्रमात सापडले आहे. त्यामुळे केवळ घोषणांचा सुकाळ आणि प्रत्यक्ष भरीव मदतीचा ह्यदुष्काळह्णच दिसून येत आहे. गतवर्षी जून महिन्याच्या प्रारंभी दमदार पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी पेरणी केली; मात्र नंतर २५ पेक्षा जास्त दिवस पावसाने दडी मारली. परिणामी काहींवर दुबार व तिबार पेरणीची वेळ आली. तरीही अल्प पावसामुळे उत्पादन प्रचंड घटले. मशागत व लागवडीसाठी कर्ज काढले. प्रसंगी संपूर्ण कुटुंबच शेतात राबले. लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकावा व खरीप हंगामातील पेरणी व मशागतीसाठी पैसा कोठून आणवा, असे एक ना अनेक प्रश्न शेतकर्‍यांना पडले आहेत. त्यामुळे तातडीने रोख स्वरूपात मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.