शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हा परिषदांच्या अस्तित्वालाच नख लावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 13:26 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत ते शासनाने स्वत:कडे तर काही इतर विभागाकडे देण्याचा सपाटा लावला आहे.

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत ते शासनाने स्वत:कडे तर काही इतर विभागाकडे देण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायत राज संस्थांच्या अस्तित्वालाच नख लावण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आता वाढत आहे. विशेष म्हणजे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी झालेल्या ७३ व्या घटनादुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षात हा प्रकार घडत आहे.‘बळकट पंचायती राज व्यवस्थेमार्फत ग्रामीण विकास’, असे ध्येय असलेल्या ग्रामविकास विभागाने गेल्या काही वर्षांत पंचायती राज व्यवस्थेत शीर्षसंस्था असलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकारांवरच गदा आणली आहे. देशातील पंचायत राज संस्थांना अधिक अधिकार मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने १९९३ मध्ये ७३ वी घटनादुरुस्ती केली. राज्याकडील अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे, तेच अधिकार जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना मिळावे, हा या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. यानुसार राज्यांकडील विविध २९ विषयांचे अधिकार जिल्हा परिषदांना मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १४ विषय तेही अंशत: जिल्हा परिषदांना देण्यात आले. त्यापैकीही काही अधिकार हळूहळू पुन्हा सरकार परत घेत आहे. विशेष म्हणजे, चालू वर्ष ७३ व्या घटनादुरुस्तीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षात घटनादुरस्तीनुसार सर्व अधिकार मिळतील, या आशेवर असलेल्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना उलट अधिकार कपातीला सामोरे जावे लागत आहे.पंचायती राज व्यवस्थेतून ग्रामविकास आणि तळागाळातील जनतेला राजकीय सत्तेत भागीदारी मिळावी, यासाठी या व्यवस्थेबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. त्यानंतर २०१४ मध्ये सत्तांतर झालेल्या सरकारने सुरुवातीपासूनच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या अस्तित्वाला नख लावणारे निर्णय घेणे सुरू केले आहे.

 कृषी विभाग उरला सेसफंडापुरता!जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे असलेले कृषी सेवा केंद्र परवाने, बियाणे विक्री परवाना, कीटकनाशक विक्री, साठा परवाना, कृषी अभियांत्रिकी योजना राज्याच्या कृषी विभागाकडे देण्यात आल्या, तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत बळकटीकरण ही योजनाही हस्तांतरित झाली आहे.

  रस्ते निर्मिती, पदभरती, शिक्षक बदल्याही शासनाकडेजिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग निर्मिती करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांच्या समितीला देण्यात आला. पदभरती शासन करणार, तर शिक्षकांच्या बदल्याही शासन स्तरावरूनच होत आहेत. वस्तू खरेदीसाठी ठरावीक कंत्राटदारांची निवड करून त्यांच्याकडूनच खरेदीचे बंधनही घालण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद