शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST

बाळापूर: यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. सध्या हरभरा गाठे धारणाच्या अवस्थेत असताना हरभऱ्यावर ...

बाळापूर: यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. सध्या हरभरा गाठे धारणाच्या अवस्थेत असताना हरभऱ्यावर मर रोगाने आक्रमण केल्याने हरभरा वाळत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तालुक्यात यंदा रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांनी हरभरा व गहू पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांपासून आशा आहे; मात्र हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मर रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.गत काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला होता. अशातच पुन्हा हरभऱ्यावर मर रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. यामुळे कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

----------------------------

उत्पादन घटणार !

ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक धोक्यात सापडले आहे. हरभऱ्यावर घाटे अळी व मर रोगाचे आक्रमण झाल्याने हरभरा पीक वाळत आहे. त्यामुळे यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

------------------------------------

मुबलक पाणी उपलब्ध असल्याने मी यंदा हरभऱ्याची पेरणी केली; मात्र घाटे धारण अवस्थेत मर रोगाने आक्रमण केल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

-शेतकरी.

----------------------------------

हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

- शेतकरी.