शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST

बाळापूर: यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. सध्या हरभरा गाठे धारणाच्या अवस्थेत असताना हरभऱ्यावर ...

बाळापूर: यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. सध्या हरभरा गाठे धारणाच्या अवस्थेत असताना हरभऱ्यावर मर रोगाने आक्रमण केल्याने हरभरा वाळत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तालुक्यात यंदा रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांनी हरभरा व गहू पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांपासून आशा आहे; मात्र हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मर रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.गत काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला होता. अशातच पुन्हा हरभऱ्यावर मर रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. यामुळे कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

----------------------------

उत्पादन घटणार !

ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक धोक्यात सापडले आहे. हरभऱ्यावर घाटे अळी व मर रोगाचे आक्रमण झाल्याने हरभरा पीक वाळत आहे. त्यामुळे यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

------------------------------------

मुबलक पाणी उपलब्ध असल्याने मी यंदा हरभऱ्याची पेरणी केली; मात्र घाटे धारण अवस्थेत मर रोगाने आक्रमण केल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

-शेतकरी.

----------------------------------

हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

- शेतकरी.