शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मदत वाटपात हेक्टरी मर्यादेत दुजाभाव

By admin | Updated: January 23, 2015 02:19 IST

दुष्काळग्रस्त बहुभूधारक शेतक-यांवर अन्याय.

संतोष येलकर / अकोला:दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरकारकडून देण्यात येत असलेल्या मदतीमध्ये अल्प, अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टरपर्यंत, तर दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन संपादन करणार्‍या बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंतच मदत दिली जात आहे. दुष्काळी परिस्थितीत सर्वच शेतकर्‍यांचे नुकसान झाले असताना, मदत वाटपात हेक्टरी र्मयादेच्या नावाखाली दुजाभाव आणि बहुभूधारक शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याची बाब समोर आली आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. नापिकीमुळे ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात शासनाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना मदत निधीचे वितरण केले असून, ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात येत असलेल्या मदतीत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत आणि बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील सर्वच शेतकर्‍यांचे पिके हातून गेल्याने नुकसान झाले. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अल्प,अत्यल्प भूधारक शेतकरी असो की बहुभूधारक, या सर्वच शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पृष्ठभूमीवर दुष्काळग्रस्त सर्वच शेतकर्‍यांकरिता मदत वाटपासाठी शेती क्षेत्राची सारखीच र्मयादा असायला हवी; मात्र सरकारकडून वाटप करण्यात येत असलेल्या मदतीत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत, तर बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंतच मदत वाटप केली जात आहे. सरकारी मदतीत हेक्टरी र्मयादेचा दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी केला आहे.जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामदास मालवे यांनी दुष्काळी परिस्थितीत सर्वच शेतकरी नुकसान झेलत आहेत; परंतु सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या मदतीत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत आणि बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यत मदत दिली जात आहे. हेक्टरी र्मयादेत शेतकर्‍यांना मदत वाटपातील हा भेदभाव दूर सारून समान हेक्टरी र्मयादेनुसार मदतीचे वाटप करण्याची मागणी केली.