शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मालमत्तांचे व्यवहार निम्यावर!

By admin | Updated: November 16, 2016 02:02 IST

बुधवार-गुरुवारी व्यवहारच झाला नाही; नोटा रद्दचा परिणाम.

अकोला : चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांची नोट बाद होण्याच्या दोन दिवसाआधी व ९ नोव्हेंबरनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दोन दिवसांत दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये व्यवहार नोंदणीमध्ये पन्नास टक्के तफावत आली आहे. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कामध्येही मोठा फटका शासनाला बसला आहे. त्यातच बाजारभाव आणि शासकीय किमतीमध्ये प्रचंड तफावतीचे व्यवहार करणार्‍यांची पाचावर धारण बसली आहे. एक हजार आणि पाचशे रुपयांची नोट व्यवहारातून बाद ठरविण्यात आली. त्या नोटा कोणाहीकडे असल्यास त्या बँकेत जमा कराव्या लागत आहेत. त्या नोटा जमा करण्यासाठी दोन लाख पन्नास ही नादेय कराची र्मयादा पाहता, त्यापेक्षा अधिक रकमेचा हिशेब आयकर विभागाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे एखाद्या मालमत्तेची विक्री करताना मुद्रांक शुल्क जेवढय़ा रकमेचे लागले. तेवढीच रक्कम अधिकृत स्रोताची समजली जाणार आहे. त्या मालमत्तेची बाजारभावाने मिळालेल्या अतिरिक्त रकमेचा हिशेब कसा द्यावा, ही विवंचना सर्वांना आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोणतीही मालमत्ता विकणे किंवा खरेदी करण्यापासून नागरिक दूरच राहत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, मुद्रांक शुल्क विभागात सध्या शांतता आहे. गेल्या मंगळवारी निर्णय होण्याच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयांना दस्त नोंदणीसाठी ३१ लाख १२ हजार मुद्रांक शुल्क मिळाले, तर नोंदणी शुल्काचे ६ लाख १५ हजार ४७0 रुपये मिळाले.

 जिल्हाभरात बसला फटका!नोटा बदलाच्या मंगळवारी रात्रीच्या निर्णयानंतर बुधवार व गुरुवार या दोन्ही दिवशी व्यवहारच झाला नसल्याचे समोर आले आहे. बाळापूर तालुक्याचा आढावा घेतला तर ९ व १0 नोव्हेंबर रोजी एकही खरेदी विक्री झाली नाही. त्याआधी ७ व ८ नोव्हेंबर रोजी येथे ८७ लाख ६ हजारांचे व्यवहार झाले होते. ११ नोव्हेंबर रोजी सहा खरेदी झाल्या असून, त्याची किंमत २८ लाख एवढी आहे. येथे तीन बक्षीसपत्रेही झालीत. पातूर तालुक्यातही असेच चित्र आहे. ७ व ८ नोव्हेंबर रोजी सात खरेदी झालेल्या या तालुक्यात ९ नोव्हेंबरपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातसुद्धा बुधवार व गुरुवारी खरेदी झालेली नाही. शुक्रवारी केवळ तीन खरेदी झाल्यात. येथे सरासरी आठ खरेदी होतात. मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये अकोट तालुक्यात घट असल्याचे दिसत आहे. येथे खरेदीचे सरासरी १५ व्यवहार दैनंदिन होतात. येथे नोटासंदर्भातील निर्णय जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी १४ मालमत्तांच्या खरेदी झाल्यात. गुरुवार, शुक्रवारी प्रत्येकी सात मालमत्तांचेही खरेदी व्यवहार झाल्याची नोंद आहे.

    काही महिन्यांपूर्वी थोडीथोडकी रक्कम देऊन 'इसारचिठ्ठी' करणार्‍या अनेकांच्या खरेदीचा व्यवहार नोव्हेंबर २0१६ महिन्यात होऊ घातला होता; मात्र बुधवारपासून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून गायब झाल्याने रोखीचा व्यवहार जवळपास अशक्य ठरला आहे. रद्द झालेल्या या नोटा स्वीकारायला कुणी तयार नाही आणि मोठय़ा रकमेचा 'विड्रॉल' द्यायला बँका तयार नाहीत, अशा द्विधा संकटात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार अडकले आहेत. या निर्णयामुळे दैनंदिन खरेदीचे व्यवहार हे सरासरी तीनवर येऊन ठेपले आहेत. मालमत्ता विक्री करणार्‍यांच्या तुलनेत खरेदी करणार्‍यांचे प्रमाण घटले आहे.