शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

जमीन एकत्रीकरणासाठी शासनाला मार्गदर्शन मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:05 IST

अकोला : गावातील ७५ टक्के खातेदारांनी मागणी केल्यास जमीन एकत्रीकरण योजना राबवण्यासाठी ग्रामसभांचे ठराव मागवण्याची तयारी भूमी अभिलेख विभागाने केली; मात्र त्यासाठी पंचायत विभागाने कोणताही पाठपुरावा न केल्याने शासनाची योजना कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडला.

अकोला : गावातील ७५ टक्के खातेदारांनी मागणी केल्यास जमीन एकत्रीकरण योजना राबवण्यासाठी ग्रामसभांचे ठराव मागवण्याची तयारी भूमी अभिलेख विभागाने केली; मात्र त्यासाठी पंचायत विभागाने कोणताही पाठपुरावा न केल्याने शासनाची योजना कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडला. त्यानंतर आता या कायद्याची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत शासनाकडूनच मार्गदर्शन मागवण्याची तयारी पंचायत विभागाने केली आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागासह तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.वारसा हक्क, खरेदी-विक्री व्यवहारांमुळे जमिनीचे सातत्याने तुकडे पडत आहेत. छोटे-छोटे विखुरलेले तुकडे होत असल्याने शेती करताना बियाणे, खते, अवजारे तुकड्यांमध्ये हलवण्याच्या कामात वेळ, श्रम, पैशांचा अपव्यय होतो, तसेच देखभालीतही अडचणी येतात. त्याशिवाय, हद्दीवरून मोठे वाद निर्माण होतात. सोबतच छोट्या तुकड्यांमध्ये शेततळे, विहीर खोदणे, पाण्याचे पाट, चर खोदणे, रस्ते ठेवणे शक्य होत नाही. या सर्व कारणांमुळे किफायतशिर शेती करणे जमत नसल्याने ती पडीत ठेवली जाते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम १९४७ अमलात आला. विदर्भ, मराठवाड्यात हा कायदा १ एप्रिल १९५९ पासून लागू झाला. या कायद्यांतर्गत राज्यातील गावांमध्ये जमीन एकत्रीकरण योजना राबवण्यात आली; मात्र ११७९६ गावांमध्ये ती राबवलीच नाही. दरम्यान, या कायद्याला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर ज्या गावातील ७५ टक्के खातेदार ग्रामसभांमध्ये तसा ठराव घेतील, त्याच गावांमध्ये ही योजना राबवण्याचे ठरले. त्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन जिल्ह्यातील गावांचे ठराव मागवण्याचा प्रयत्न भूमी अभिलेख विभागाने केला. विशेष ग्रामसभेत हा ठराव ठेवण्याचे भूमी अभिलेख विभागाने म्हटले. वर्षात आता चारच ग्रामसभा घेता येतात, अशी परिस्थिती असली तरी एप्रिल २०१८ नंतर आतापर्यंत तीन ग्रामसभा पार पडल्या. त्यापैकी कोणत्याही सभेत जमीन एकत्रीकरणाच्या ठरावावर चर्चाच झाली नाही. त्यातच खातेदारांनी एकत्र येऊन मागणी केल्यास ही योजना राबवता येईल. त्यासाठी प्रशासन काय करू शकते, याबाबत शासनाकडेच मार्गदर्शन मागवण्याची तयारी पंचायत विभागाने केली. त्यानुसार जिल्ह्यात विशेष ग्रामसभा घेण्याबाबत शासन काय सांगते, यावरच योजनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला