शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

कला, वाणिज्य शाखेच्या दहा हजार जागा रिक्त राहणार!

By admin | Updated: June 22, 2017 04:36 IST

विद्यार्थ्यांंचा कल विज्ञान शाखेकडे; विद्यार्थी उत्तीर्ण २५ हजार, जागा ३५ हजार.

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही वर्षांंमध्ये विद्यार्थ्यांंचा विज्ञान शाखेकडे कल वाढला आहे. करियरच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी आणि पालक विज्ञान शाखेला अधिक महत्त्व देत आहेत. विज्ञान शाखेविषयी असलेले आकर्षण केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंनासुद्धा आहे. यंदा दहावीमध्ये फ्रेश व रिपिटर मिळून २५ हजार ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि जिल्हय़ातील २३१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ३५ हजार ४४0 जागा आहेत. त्यामुळे यंदा कला, वाणिज्य शाखेच्या १0 हजार ३४८ जागा रिक्त राहणार आहेत. विज्ञान शाखेकडे वाढता ओढा पाहता, दरवर्षी जिल्हय़ात पाच ते सहा नवीन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांची भर पडत आहे. कला आणि वाणिज्य शाखेत शिकून करियर घडत नसल्याचा गैरसमज पालकांमध्ये पसरलेला आहे. प्रथम श्रेणीतील विद्यार्थी नाही, तर द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेला विद्यार्थीही विज्ञान विषयांना महत्त्व देत आहे. विज्ञान शाखेत शिकून अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासोबतच कृषी अभियांत्रिकी, परिचारिका, डीएमएलटी, पशुवैद्यकीय, बीएससीकडे जाण्याचा विद्यार्थ्यांंचा कल असल्यामुळे कला, वाणिज्य शाखेचे महत्त्व कमी होत आहे. व्यवसायाला करियर म्हणुन बघणारे थोडेबहुत विद्यार्थी किंवा सीए म्हणून करियर करू इच्छिणारे विद्यार्थीच वाणिज्य शाखेला महत्त्व देत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे कला शाखेच्या तर सर्वाधिक जागा दरवर्षी रिक्त राहतात. विज्ञान शाखेची वाढती मागणी पाहता, शिक्षण विभागालासुद्धा विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी लागत आहे. कला, वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतरही या दोन्ही शाखेच्या १0 हजार ३४८ जागा रिक्त राहणार असल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे.