शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चाेरणाऱ्या १२ टाेळ्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस दुचाकी चाेरीच्या प्रमाणात वाढ हाेत असल्याचे दिसून येते. जानेवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस दुचाकी चाेरीच्या प्रमाणात वाढ हाेत असल्याचे दिसून येते. जानेवारी ते नाेव्हेंबर २०२०पर्यंत ३६०पेक्षा जास्त दुचाकींची चाेरी झाली आहे. या दुचाकींचा शाेध घेताना पाेलिसांनी १२ चाेरट्यांच्या टाेळ्या जेरबंद करून त्यांच्याकडून २३०पेक्षा जास्त दुचाकी जप्त करून त्या दुचाकी संबंधित मालकांना न्यायालयाच्या आदेशावरून परत केल्या.

दुचाकी चाेरी केल्यानंतर या चाेरट्यांनी दुचाकी विकल्या नाही गेली तर त्यांचे पार्ट वेगळे करून विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती पाेलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यातही चाेरीच्या दुचाकी विक्री केल्याची माहिती समोर आली आहे, तर काहींनी पैशाची अडचण दाखवून गाडी तुमच्याकडे ठेवा म्हणून १० ते १५ हजार रुपयांमध्ये अनेकांना दुचाकी विकल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. चाेरट्यांकडून जप्त करण्यात आलेली वाहने पाेलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आली असून, मूळमालकांचा शाेध घेऊन त्यांना ती परत करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. ज्या वाहनांच्या मालकांचा शाेध लागला नाही त्यांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

.............

दुचाकी चाेरट्यांवर पायबंद घालण्यासाठी पाेलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. या वर्षभरात जवळपास दुचाकी चाेरी करणारी १२ टाेळी पकडण्यात आली आहे. त्याशिवाय चाेरी, दराेडा प्रकरणांतील ३०पेक्षा अधिक गुन्ह्यातील आराेपींना पिस्टलसह अटक केली. १० ते १२ भुरट्या दुचाकी चाेरांनाही पकडले आहे.

- शैलेश सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख, अकाेला

...........

पार्ट काढून केली जाते विक्री

चाेरीच्या गाडीचे पार्ट, नंबरप्लेट बदलून जिल्ह्यातच विक्री केली जाते. किंवा लगतच्या जिल्ह्यात नेऊन वाहने विकली जातात. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातच चाेरीच्या दुचाकी विक्री करणाऱ्या टाेळीला जेरबंद करण्यात आले हाेते. त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणात दुचाकी चाेरी केल्याचे उघडकीस आले हाेते.

८६पेक्षा अधिक चोरटे पकडले

दुचाकी विक्री करणाऱ्या १२ टाेळ्या व १० ते १२ भुरटे चाेर असे जवळपास ८६ पेक्षा अधिक दुचाकी चाेरट्यांना पाेलिसांनी पकडले. त्यांच्याकडून वाहनेही जप्त करण्यात आली, तर काही वाहनांचे मालक समाेर येत नसल्याने ही वाहने सध्या पाेलीस ठाण्यांमध्ये पडून आहेत.