शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 12:33 IST

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारी संशोधनावर भर देत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी करावी, यासाठीची शेती शाळा भरवून शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

अकोला: राज्यात ४० लाख हेक्टरवर असलेले खरीप ज्वारीचे क्षेत्र आता ८ ते ९ लाखांवर आले असून, यामुळे गुरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण तर झालाच, हमखास कमी पावसात येणाऱ्या या पिकामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारी संशोधनावर भर देत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी करावी, यासाठीची शेती शाळा भरवून शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सोमवारी संपूर्ण कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापर्यंत तीनच्यावर खरीप ज्वारीची जात विकसित केली असून, रब्बी हंगामासाठी विशेष पीकेव्ही क्रांती, हुरड्याची पीडीकेव्ही कार्तिकी ज्वारीचे वाणही विकसित केले आहे. हे गोड असून, चव चांगली आहे; पण गेल्या काही वर्षात ज्वारीची पेरणीच घटली आहे. याला पावसाची अनिश्चितता असल्याचे सांगण्यात येत असले तरी ज्वारीला मिळणारे तुटपुंजे दर हे कारण महत्त्वाचे आहे, तसेच पेरणी केल्यानंतर होणारा वन्य प्राण्याचा त्रासही मोठा असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीकडे पाठ फिरवली आहे; परंतु यामुळे राज्यात विशेषत: विदर्भात गुरांच्या वैरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पृष्ठभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने ज्वारी पेरणीची चळवळ सुरू केली असून, पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठीच शेतकऱ्यांच्या शेतावर शेती शाळा घेऊन शेतकऱ्यांना ज्वारीची पेरणी, संगोपण, तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येत आहे. यावर्षी ही सुरुवात अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप या गावातून सोमवार, ११ फेब्रुवारी करण्यात आली आहे. शेतीशाळेला कृषी विद्यापीठच अवतरल्याने शेतकऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

- रब्बी ज्वारीचे क्षेत्र राज्यात २८ लाख हेक्टरवर असले तरी पावसावर अवलंबून असलेल्या खरीप ज्वारीचे क्षेत्र ४० लाखाहून ८ लाखावर आले आले. म्हणूनच ज्वारी संशोधन करू न शेतकºयांना ज्वारी पेरणीसाठी शेतावर जाऊन प्रोत्साहन देण्यात येत आहे.डॉ. आर.बी. घोराडे,ज्वार संशोधक,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती