शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

या बस आहेत की गळक्या पत्र्यांचे घर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST

कोरोनामुळे सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या काळात एसटी बस सुरू नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावेत, याची चिंता ...

कोरोनामुळे सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या काळात एसटी बस सुरू नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावेत, याची चिंता एसटी प्रशासनाला लागली होती. जिल्ह्यासह राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुन्हा एसटी बस सुरू करण्यात आल्या. प्रमुख मार्गावर बस धावत असल्याने प्रवासी भाड्यातून उत्पन्न हाती येत आहे. एसटीचा कारभार पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच जिल्ह्यातील आगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात गळक्या एसटी बस डोकेदुखी ठरत आहेत. आगार क्रमांक १ व २ मधील काही बस पावसात गळत आहेत. टपावरून पाणी थेट आतमध्ये येत असल्याने प्रवासी चिंब होत आहेत. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच व चांगली बस बघूनच प्रवासी बसमध्ये चढत आहेत.

बसला वेदर स्ट्रीप

पावसाळ्याच्या दिवसात एसटी महामंडळाच्या बसच्या छतामधून किंवा खिडकीतून पाणी गळू नये, याकरिता प्रत्येक बसला वेदर स्ट्रीप लावण्यात येते. अकोला विभागातील किती बसला या स्ट्रीप लावण्यात आल्या याबाबत माहिती मिळू शकली नाही.

एसटीचा कसरतीचा प्रवास

काही लांब पल्ल्याच्या बस ग्रामीण भागातून जातात. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र, खिळखिळ्या बस सोडल्या जात असल्याने पावसाच्या पाण्याने गळत आहेत. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

- जीवन इंगळे

लालपरीचे ग्रामीण भागातील प्रवाशांना आजही आकर्षण आहे. याच लालपरीचा ग्रामीण प्रवाशांना माेठा आधार आहे. मात्र, माेडकळीला आलेल्या, गळणाऱ्या बसमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

- विजय भिसे

गाड्यांचा मेंटेनन्स वाढला; पण पैसा नाही!

काेराेना काळात गेल्या अनेक महिन्यांपासून बहुतांश बस जाग्यावरच थांबून आहेत. अशावेळी बसचा मेंटनन्सचा खर्च वाढला आहे. अनेक भंगारातील बस दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा निधी नाही.

मात्र, डिझेलचा तुटवडा नसला तरी इंधनाचे दर वाढल्याने माेठी कसरत करून अकोला विभागाला प्रवासी सेवा द्यावी लागत आहे; पण अकोला आगाराला डिझेलअभावी एकही बस उभी ठेवावी लागली नाही.

नादुरुस्त बस, गळणाऱ्या बस आणि आसनव्यवस्था दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आर्थिक घडी अद्यापही बसलेली नाही. अशा स्थितीत आवश्यक बाबींवरच निधी खर्च केला जात आहे.