शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

उपाययोजना मंजूर; पण कामे केव्हा होणार?

By admin | Updated: April 20, 2016 02:13 IST

पाणीटंचाई निवारणाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींचा सवाल.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात विविध उपाययोजना मंजूर करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्ष पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा होणार, असा सवाल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पाणीटंचाई निवारणाच्या आढावा बैठकीत उपस्थित केला. तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थि ती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, महापौर उज्ज्वला देशमुख, आ.हरीश पिंपळे, आ.बळीराम सिरस्कार, आ. रणधीर सावरकर, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार उपस्थित होते. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृ ती आराखडा प्रशासनामार्फत मंजूर करण्यात आला; मात्र उ पाययोजनांची कामे केव्हा होणार, पाणीटंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा लाभ केव्हा मिळणार, संबंधित गावांमधील पाणीटंचाईचे निवारण केव्हा होणार, असा सवाल आ. हरीश पिंपळे, आ.रणधीर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे यांनी या बैठकीत उपस्थित केला. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण झाली पाहिजे, अशी सूचनाही लोकप्रतिनिधींनी या बैठकी त लावून धरली. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.