शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
5
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
6
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
7
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
9
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
10
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
11
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
12
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
13
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
14
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
15
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
16
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
17
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
18
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
19
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
20
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!

उपाययोजना मंजूर; पण कामे केव्हा होणार?

By admin | Updated: April 20, 2016 02:13 IST

पाणीटंचाई निवारणाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींचा सवाल.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात विविध उपाययोजना मंजूर करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्ष पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा होणार, असा सवाल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पाणीटंचाई निवारणाच्या आढावा बैठकीत उपस्थित केला. तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थि ती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, महापौर उज्ज्वला देशमुख, आ.हरीश पिंपळे, आ.बळीराम सिरस्कार, आ. रणधीर सावरकर, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार उपस्थित होते. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृ ती आराखडा प्रशासनामार्फत मंजूर करण्यात आला; मात्र उ पाययोजनांची कामे केव्हा होणार, पाणीटंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा लाभ केव्हा मिळणार, संबंधित गावांमधील पाणीटंचाईचे निवारण केव्हा होणार, असा सवाल आ. हरीश पिंपळे, आ.रणधीर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे यांनी या बैठकीत उपस्थित केला. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण झाली पाहिजे, अशी सूचनाही लोकप्रतिनिधींनी या बैठकी त लावून धरली. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.