शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

उपाययोजना मंजूर; पण कामे केव्हा होणार?

By admin | Updated: April 20, 2016 02:13 IST

पाणीटंचाई निवारणाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींचा सवाल.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात विविध उपाययोजना मंजूर करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्ष पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा होणार, असा सवाल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पाणीटंचाई निवारणाच्या आढावा बैठकीत उपस्थित केला. तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थि ती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, महापौर उज्ज्वला देशमुख, आ.हरीश पिंपळे, आ.बळीराम सिरस्कार, आ. रणधीर सावरकर, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार उपस्थित होते. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृ ती आराखडा प्रशासनामार्फत मंजूर करण्यात आला; मात्र उ पाययोजनांची कामे केव्हा होणार, पाणीटंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा लाभ केव्हा मिळणार, संबंधित गावांमधील पाणीटंचाईचे निवारण केव्हा होणार, असा सवाल आ. हरीश पिंपळे, आ.रणधीर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे यांनी या बैठकीत उपस्थित केला. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण झाली पाहिजे, अशी सूचनाही लोकप्रतिनिधींनी या बैठकी त लावून धरली. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.