शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

उमेदवारांची लगबग; बैठकांना ऊत

By admin | Updated: October 1, 2014 01:24 IST

अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मनधरणी करताना नेत्यांची दमछाक.

आशिष गावंडे / संतोष येलकर अकोला- जिल्ह्यात विधानसभेची पहिल्यांदाच पंचरंगी लढत होत असल्यामुळे निवडणूक रिंगणातील दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचारासाठी अवघ्या तेरा दिवसांचा अवधी मिळत असल्याने वेळ न दवडता उमेदवारांनी घरोघरी जाऊन बैठकांना सुरुवात केल्याचे चित्र आहे. आजपर्यंत कधीही विचारपूस न झालेल्या कार्यकर्त्यांची मोठय़ा आस्थेने विचारपूस करण्यासोबतच नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहेत.राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप, शिवसेनेच्यावतीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जात असल्याने आजपर्यंत गळ्य़ात गळे घालून एकमेकांसाठी मतांचा जोगवा मागणार्‍या उमेदवारांची प्रचंड कोंडी झाली आहे. युती असो वा आघाडी, जाहीर कार्यक्रमांमध्ये सहकार्‍यांना कोपरखळी मारून जनतेचे मनोरंजन करणारेच आता एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात दंड थोपटून आहेत. साहजिकच, संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांंनादेखील पेच पडला असून, आजवर ज्या उमेदवारांसाठी खांद्यावर झेंडा घेऊन राजकीय वातावरण निर्मिती केली, त्याच उमेदवाराच्या विरोधात आवाज काढावा लागणार आहे. अशा बिकट परिस्थितीत सापडलेले कार्यकर्ते सैरावरा झाल्याची वस्तुस्थिती आहे. या सर्व बाबींची जाण निवडणूक रिंगणातील उमेदवारांना असल्याने कार्यकर्त्यांची समजूत घालताना, त्यांचीही चांगलीच दमछाक होत आहे. ह्यत्याह्ण उमेदवारापेक्षा मीच कसा तुमच्या समस्या चुटकीसरशी सोडवून विकास कामांना गती देऊ शकतो, अशा स्वरूपाच्या आश्‍वासनांची खैरात केल्या जात आहे. १ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, १३ ऑक्टोबरपर्यंंत प्रचार करण्याचा अवधी राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. प्रचाराचा अल्प कालावधी लक्षात घेता व अद्यापी जाहीर सभांना सुरुवात न झाल्यामुळे उमेदवारांनी घरोघरी जाऊन समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे मन वळविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत.