शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ईटीआय मशीनचा वाहकांना वैताग; कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : प्रवाशांना तिकीट देण्याकरिता जिल्ह्यातील पाचही आगारांतर्गत कार्यरत असलेल्या एस.टी.च्या वाहकांना ईटीआय मशीन (ई-तिकीट वेडिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : प्रवाशांना तिकीट देण्याकरिता जिल्ह्यातील पाचही आगारांतर्गत कार्यरत असलेल्या एस.टी.च्या वाहकांना ईटीआय मशीन (ई-तिकीट वेडिंग मशीन) देण्यात आलेल्या आहेत; मात्र अनेक मशीन नादुरुस्त होऊन बंद पडल्या आहेत. त्याचा वाहकांना नाहक वैताग होत असून, कारवाईच्या भीतीने त्यांचे मानसिक संतुलनदेखील बिघडत चालल्याचे बोलले जात आहे.

खराब ईटीआय मशीनमुळे माझ्या प्रामाणिकतेवर अप्रामाणिकतेचा ठपका लागणार आहे, असे लिहून ठेवत नांदेड येथील एका वाहकाने माहुर आगारातील बसमध्ये आत्महत्या केली. मशीनमधील तांत्रिक चुकांचा दोष माझ्यावर टाकला जाणार असून, माझ्या आत्महत्येला कुटुंबातील कोणीही दोषी नाही; तर खराब ई-तिकीट मशीन देणारे एसटी प्रशासन दोषी असल्याचे चार पानी पत्र लिहून नांदेड शहरात वास्तव्यास असलेल्या एस. एस. जानकर नामक एस. टी. वाहकाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातीलच माहूर आगारातील एका बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे नादुरुस्त ईटीआय मशीनचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वर्षभरात तक्रारींचे द्विशतक

जिल्ह्यातील पाचही आगारांतर्गत कार्यरत असलेल्या वाहकांना देण्यात आलेल्या ईटीआय मशीन प्रवासादरम्यान बंद पडण्याचे अनेक प्रकार गेल्या वर्षभरात घडले आहेत. त्या-त्या आगारात यासंबंधीच्या २०० पेक्षा अधिक तक्रारी झालेल्या आहेत. असे असले तरी हा प्रकार अद्याप कायम आहे.

प्रवासादरम्यान तिकीट वितरित करीत असतानाच ईटीआय मशीन बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. अशावेळी वाहकांना नाइलाजास्तव कागदावर प्रवासाकरिता आकारलेले पैसे लिहून द्यावे लागतात; मात्र ही पद्धत नियमबाह्य असून तपासणी पथक ही अडचण समजून घेत नसल्याचे काही वाहकांचे म्हणणे आहे.

आजरोजी जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक ईटीआय मशीन नादुरुस्त असून त्या विनाविलंब दुरुस्त करून मिळाव्यात, अशी मागणीही होत आहे.

रोज बिघडतात १० मशीन

अकोला १, अकोला २, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच आगारांना ३०० च्या आसपास मशीन देण्यात आलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक आगारातील १० मशीन दैनंदिन नादुरुस्त होतात. यामुळे वाहक वैतागले आहेत.

वाहक म्हणतात.....

पूर्वी ‘ट्रे’च्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटे दिली जायची. ही पद्धत मोडीत काढून काही वर्षांपासून ईटीआय मशीनद्वारे तिकिटे देण्याची पद्धत अंमलात आणण्यात आली. या मशीनने सोय झाली; मात्र मशीन नादुरुस्त झाल्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

- टी. एन. गावंडे, वाहक

ईटीआय मशीन नादुरुस्तीमुळे कधी तिकिटाची प्रिंट न निघणे, प्रवासादरम्यान १० ते १५ मिनिटे मशीन हँग होणे यांसह इतरही स्वरूपातील अडचणी जाणवतात. अशात लाइन चेकिंग पथकाने तपासणी केल्यास तिकिटांमध्ये गोंधळ झाल्याचा ठपका ठेवला जातो.

- अ. सा. गवळी, वाहक

एस. टी. आगाराला ईटीआय मशीन मिळालेल्या आहेत. त्यातील २० मशीन नादुरुस्त असून विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित मशीन सध्यातरी सुस्थितीत सुरू आहेत. मशीन नादुरुस्त झाल्याची वाहकांची तक्रार आल्यास त्याची तत्काळ दखल घेतली जाते. एकाही वाहकावर यासंबंधी कारवाई करण्यात आलेली नाही.

- अरविंद पिसोडे, आगार प्रमुख, अकोला

जिल्ह्यातील पाच आगारांना महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांना तिकिटे देण्याकरिता ईटीआय मशीन देण्यात आलेल्या आहेत. यामुळे निश्चितपणे वाहकांची सोय झाली; परंतु अनेक मशीनमध्ये बिघाड निर्माण होत आहे. प्रवासादरम्यान मशीन हँग होण्याचे प्रकारही घडत आहेत. ही अडचण गेल्या काही दिवसांत अधिकच वाढली आहे. यात कुठलाच वाहक दोषी नाही. त्यामुळे कारवाई करताना सारासार विचार व्हायला हवा.

- सुदर्शन पजई