शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

घोषणांचा बाजार; फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST

अकोला : संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने व्यवसाय बंद राहणाऱ्या फेरीवाल्यांना दीड हजार आर्थिक साहाय्य देण्याचे घोषित केले होते. ...

अकोला : संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने व्यवसाय बंद राहणाऱ्या फेरीवाल्यांना दीड हजार आर्थिक साहाय्य देण्याचे घोषित केले होते. अकोला शहरातील यात ६ हजार ४ नोंदणीकृत फेरीवाले आहे; मात्र या फेरीवाल्यांच्या हाती एक पैसाही पडला नाही. त्यामुळे हा केवळ घोषणांचा बाजार नाही ना? असे विचारले जात आहे. शासनाने लागू केलेल्या संचारबंदीत भाजीपाला, फळे, किराणा दुकान, मेडिकल, किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते, कृषी अवजारे यांना वगळून इतर सर्व फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरात सद्य:स्थितीत नोंदणीकृत ६ हजार ४ विविध प्रकारचे फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांना संचारबंदीत दीड हजार रुपये आर्थिक मदत करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील मनपाकडे नोंदणी असलेल्या फेरीवाल्यांनाच ही मदत मिळणार असून, लवकरच याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती. या फेरीवाल्यांना थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार होते. मात्र, या रकमेतील एक दमडीही फेरीवाल्यांच्या हाती आली नाही. ही मदत केव्हा मिळणार, याची शाश्वती नाही. त्यामुळे संचारबंदीच्या कठीण काळात ही मदत तत्काळ देण्याची मागणी होत आहे.

--पॉईंटर--

जिल्ह्यातील नोंदणीकृत फेरीवाले

६,००४

नोंदणी नसलेल्यांची संख्या

२३५१

--कोट--

फेरीवाले म्हणतात...

शासनाच्या या तुटपुंज्या मदतीत पुरेसा किराणाही होणार नाही; परंतु कोरोनाच्या काळात घरखर्च चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे हाती आलेला रुपयाही कामाचा आहे. त्यामुळे ही मदत लवकर मिळावी, हीच अपेक्षा आहे.

- विनेश वाणी

--कोट--

शासनाच्या दीड हजार रुपये देण्याच्या घोषणेला महिना उलटून गेला आहे. अद्यापपर्यंत रुपयाही प्राप्त झाला नाही. संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहे. यापुढे हीच स्थिती राहिल्यास घरखर्च चालविणे अशक्य होणार आहे.

- पांडुरंग इंगळकर

--कोट--

दिवसाला ४००-५०० रुपये व्यवसाय सुटत होता; परंतु संचारबंदीमुळे पैशांची आवक बंद आहे. व्यवसाय सुरू नसल्याने अनेक अडचणी येत आहे. घरखर्च कसा चालवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- शे. कलीम

--कोट--

आम्ही नोंदणीकृत फेरीवाल्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सोपवली. आत्मनिर्भर याेजनेतून त्यांना कर्जासाठी २७२६ फेरीवाल्यांना पात्र ठरविले आहे. त्यांच्यासह ज्यांची नाेंदणी १५ एप्रिल २०२१ पूर्वी झाली आहे, त्या सर्वांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घाेषणेचा लाभ मिळेल. सध्या तरी लाभार्थींना रक्कम प्राप्त झाली नाही, थेट त्यांच्याही खात्यात रक्कम जमा होईल.

- गणेश बिल्लेवार, समन्वयक 'एनयूएलएम', मनपा