शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
3
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
4
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
5
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
6
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
7
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
8
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
9
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
10
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
11
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
12
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
13
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
14
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
15
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
16
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
17
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
18
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
19
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
20
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

पाणी, स्वच्छतागृहांशिवाय अंगणवाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:15 IST

अकोला : बालक हा देशाचे भविष्य आहे, हे सांगणार्‍या शासनाकडूनच बालकांना पाणी, स्वच्छतागृहांच्या अभावात अंगणवाड्यांमध्ये बसणे भाग पाडले जात आहे. जिल्ह्यातील १३९0 पैकी ७८३ अंगणवाड्यात स्वच्छतागृह नाहीत, ५0५ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. यावरून बालकांच्या शिक्षण आणि आरोग्याबद्दल शासन किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. 

ठळक मुद्देजिह्यात १३९0 अंगणवाड्यांमध्ये एक लाखावर बालकेअंगणवाड्यांमधील बालकांची गैरसोय

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बालक हा देशाचे भविष्य आहे, हे सांगणार्‍या शासनाकडूनच बालकांना पाणी, स्वच्छतागृहांच्या अभावात अंगणवाड्यांमध्ये बसणे भाग पाडले जात आहे. जिल्ह्यातील १३९0 पैकी ७८३ अंगणवाड्यात स्वच्छतागृह नाहीत, ५0५ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. यावरून बालकांच्या शिक्षण आणि आरोग्याबद्दल शासन किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. ग्रामीण भागात एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी अंगणवाड्या, मिनी अंगणवाड्या चालविल्या जातात. कुपोषण कमी करणे, त्यासाठी बालकांना पूरक पोषण आहार देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीचे विविध उपक्रमही राबवले जातात. त्याचवेळी त्या अंगणवाड्यांमध्ये बालकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचाही विरोधाभास आहे. त्याशिवाय, एवढय़ा लहान बालकांना कोणतीच समज नसते. त्यांच्या शारीरिक स्वच्छतेसाठी स्वच्छतागृहांची सोय आवश्यक असताना जिल्ह्यातील ६0 टक्क्यांपेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये ती सोयच नसल्याची आकडेवारी आहे. देशात विकासाचे ढोल बडवणे सुरू असताना अंगणवाड्यातील बालकांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्यासाठी प्रचंड खर्च केला जातो. त्यातून नेमका कोणाचा विकास साधला जात आहे, ही बाबही शोधाची आहे.

अंगणवाड्यांमधील बालकांची गैरसोयजिल्ह्यातील एकूण १३९0 अंगणवाड्यांमध्ये सद्यस्थितीत १ लाख ५ हजार ६७६ बालके आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असलेल्या बालकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची सोय करण्यास शासनाची प्रचंड दिरंगाई होत आहे. 

पूरक पोषण आहाराचा वाया जाणारा खर्चअंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण आहार वाटप योजनेतील पन्नास टक्के  खर्च काहींचे हित साधण्यासाठी केला जात आहे. त्याचा लेखाजोखा घेतल्यास राज्यातील सत्ताधारी आणि काही विरोधकांचे हात किती बरबटले आहेत, याचा पर्दाफाश होतो. पूरक पोषण आहाराच्या नावावर डल्ला मारणारांनी अंगणवाड्यातील ही समस्या निकाली काढण्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.