शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पाणी, स्वच्छतागृहांशिवाय अंगणवाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:15 IST

अकोला : बालक हा देशाचे भविष्य आहे, हे सांगणार्‍या शासनाकडूनच बालकांना पाणी, स्वच्छतागृहांच्या अभावात अंगणवाड्यांमध्ये बसणे भाग पाडले जात आहे. जिल्ह्यातील १३९0 पैकी ७८३ अंगणवाड्यात स्वच्छतागृह नाहीत, ५0५ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. यावरून बालकांच्या शिक्षण आणि आरोग्याबद्दल शासन किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. 

ठळक मुद्देजिह्यात १३९0 अंगणवाड्यांमध्ये एक लाखावर बालकेअंगणवाड्यांमधील बालकांची गैरसोय

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बालक हा देशाचे भविष्य आहे, हे सांगणार्‍या शासनाकडूनच बालकांना पाणी, स्वच्छतागृहांच्या अभावात अंगणवाड्यांमध्ये बसणे भाग पाडले जात आहे. जिल्ह्यातील १३९0 पैकी ७८३ अंगणवाड्यात स्वच्छतागृह नाहीत, ५0५ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. यावरून बालकांच्या शिक्षण आणि आरोग्याबद्दल शासन किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. ग्रामीण भागात एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी अंगणवाड्या, मिनी अंगणवाड्या चालविल्या जातात. कुपोषण कमी करणे, त्यासाठी बालकांना पूरक पोषण आहार देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीचे विविध उपक्रमही राबवले जातात. त्याचवेळी त्या अंगणवाड्यांमध्ये बालकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचाही विरोधाभास आहे. त्याशिवाय, एवढय़ा लहान बालकांना कोणतीच समज नसते. त्यांच्या शारीरिक स्वच्छतेसाठी स्वच्छतागृहांची सोय आवश्यक असताना जिल्ह्यातील ६0 टक्क्यांपेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये ती सोयच नसल्याची आकडेवारी आहे. देशात विकासाचे ढोल बडवणे सुरू असताना अंगणवाड्यातील बालकांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्यासाठी प्रचंड खर्च केला जातो. त्यातून नेमका कोणाचा विकास साधला जात आहे, ही बाबही शोधाची आहे.

अंगणवाड्यांमधील बालकांची गैरसोयजिल्ह्यातील एकूण १३९0 अंगणवाड्यांमध्ये सद्यस्थितीत १ लाख ५ हजार ६७६ बालके आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असलेल्या बालकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची सोय करण्यास शासनाची प्रचंड दिरंगाई होत आहे. 

पूरक पोषण आहाराचा वाया जाणारा खर्चअंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण आहार वाटप योजनेतील पन्नास टक्के  खर्च काहींचे हित साधण्यासाठी केला जात आहे. त्याचा लेखाजोखा घेतल्यास राज्यातील सत्ताधारी आणि काही विरोधकांचे हात किती बरबटले आहेत, याचा पर्दाफाश होतो. पूरक पोषण आहाराच्या नावावर डल्ला मारणारांनी अंगणवाड्यातील ही समस्या निकाली काढण्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.