शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अन् सभागृह पडले अपुरे!

By admin | Updated: September 30, 2015 00:27 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या युवा महोत्सवास उणीवांना ग्रासले.

खामगाव: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या युवा महोत्सवात गो.से. महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनातील उणिवा पहिल्याच दिवशी स्पष्टपणे समोर आल्या. सभागृहात साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. लोकनृत्याच्या पहिल्या स्पर्धेला महाविद्यालयीन युवक-युवतींची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली. सभागृह अपुरे पडल्याने विद्यार्थ्यांंनी सभागृहाच्या खिडकीत लटकून कार्यक्रमाचा आनंद घेतला. या महोत्सवात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ४00 पैकी ३00 पेक्षा जास्त महाविद्यालय सहभागी झाले आहेत. एका महाविद्यालयातील ४0 ते ४५ जणांची चमू सहभागी झाल्याने, गो.से. महाविद्यालयात पश्‍चिम विदर्भातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठी गर्दी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांंची गर्दी लक्षात घेता, महाविद्यालयाने तसे नियोजन करायला हवे होते. सभागृहाच्या बाहेर मंडप टाकणे अपेक्षीत होते; मात्र याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांंना चक्क सभागृहाबाहेर उभं राहून तसेच खिडकीला लटकून कार्यक्रमाचा आनंद घेण्याची वेळ आली होती. इतकेच नव्हे विद्यार्थ्यांंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात न आल्यामुळे अनेकांनी याबाबत रोष व्यक्त केला. तर एका महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांंना वितरीत केल्या जाणार्‍या पाणी पाऊचवरही आयोजक असलेल्या महाविद्यालयाने बंदी घातली. या विद्यार्थ्यांंना आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क गो.से.महाविद्यालयात लावण्यात आलेल्या पाणी बाटल्या आणि पाऊच विक्रीच्या स्टॉलचा रस्ता दाखविण्यात येत होता. तर महाविद्यालयातील मुत्रीघरांना कार्यक्रम सुरू असतानाच रंगरंगोटीचे काम सुरू होते. सभागृहात पंखे नसल्यामुळे मान्यवर, निमंत्रितांसह विद्यार्थ्यांंनाही चांगलाच त्रास सहन करावा लागला. लोकनृत्य स्पर्धेत मलकापूर येथील जनता महाविद्यालयाने कोळी गीत सादर केले; मात्र हे गीत चित्रपटातील असल्याची सबब पुढे करीत परीक्षकांनी अध्र्यावरच सादरीकरण थांबविले. नियमावली आधीच दिली असल्याने, तुम्ही हे गीत पुढे सादर करू शकत नाही, असे परीक्षकांनी सांगितले. त्यामुळे चिडलेल्या जनता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंनी आपण यापूर्वी या गीताचे अमरावती विद्यापीठात सादरीकरण केले आहे.

*नियोजित वेळेपेक्षा दोन तासांचा विलंब!

नियोजनाच्या अभावामुळे कार्यक्रम पत्रिकेवरील वेळेपेक्षा तब्बल दोन तासांपर्यंंतचा विलंब सर्वच सभागृह आणि खोल्यांमधील स्पर्धा सुरू होण्यास लागला. उद्घाटन समारंभही नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुरू झाला. उद्घाटन सोहळा पार पडलेल्या सभागृहात पंखे नसल्याचेही विद्यार्थ्यांंसह मान्यवरांनी अधोरेखित केले.

परीक्षकांनाही साहित्य देण्यास विलंब!

युवा महोत्सवातील पहिल्याच लोकनृत्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी आलेल्या परीक्षकांना लागणारे साहित्य आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आले नाही. परीक्षण तक्ता, पेन, पेन्सिल, अत्याधुनिक घडीसाठी काही वेळ परीक्षक अडून बसल्याचे चित्र यावेळी दिसून आले.