शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

हरितगृहातून अमरावती विभाग गायब

By admin | Updated: August 21, 2015 00:08 IST

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम.

संतोष वानखडे/वाशिम : शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनेपैकीच एक असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सद्यस्थितीत २0२५ हरितगृहे उभारल्या गेली आहेत. अमरावती विभागात मात्र एकही हरितगृह उभारल्या गेले नाही. बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही बदल होत आहेत. पारंपरिक पद्धतीने अपेक्षीत उत्पादन हाती येत नसल्याने शेतीत नानाविध प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगांना शासनाच्या अनुदानित योजनांमुळे ह्यअर्थह्ण प्राप्त होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतमालाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सद्यस्थितीत २0२५ हरितगृहे उभारण्यात आली आहेत. पिकांसाठी वातावरण नियंत्रित करण्यात हरितगृह महत्त्वाची भूमिका बजावतात. तापमान नियंत्रित करणे, कॉर्बन डायऑक्साईड व किड नियंत्रण आदी बाबी हरितगृहांमुळे सहज शक्य होतात. भाजीपाला आणि फळबाग उत्पादक शेतकर्‍यांसाठी हरितगृह महत्त्वाची ठरत आहेत. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, नाशिक या विभागात फळबाग व भाजीपाला उत्पादन मोठय़ा प्रमाणात असल्याने हरितगृह ही संकल्पना येथे पूर्णत: रूजली आहे. हरितगृहासाठी खर्चही जास्त असल्याने आणि अमरावती विभागात मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यात हरितगृह उभे राहू शकले नाहीत.