शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कृषिपंप व यंत्रमागधारकांना ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान

By admin | Updated: August 17, 2015 01:23 IST

कमी दरात कृषिपंप देण्याकरिता शासनाने निवडला सौरपंपाचा पर्याय.

अकोला : शेतात विद्युत पुरवठा देण्याकरिता खांब, तार व रोहित्रांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत असून, आतापर्यंत राज्य शासनाने कृषिपंप व यंत्रमागधारकांना ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान दिले आहे. तसेच हा अवाढव्य खर्च टाळून शेतकर्‍यांना कमी दरात कृषिपंप देण्याकरिता शासनाने सौरपंपाचा पर्याय निवडला आहे. आतापर्यंत राज्यात ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान दिल्यावरही २0११ पासून दीड लाखांपेक्षा जास्त कृषिपंपाचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांनी नियमानुसार पैसेही भरले आहेत. शेतकर्‍यांकडे पाण्याचीही व्यवस्था आहे. मात्र, राज्य शासनाकडील मुबलक निधीअभावी शेतकर्‍यांना कृषिपंप जोडण्या देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून, त्वरित कृषिपंप देण्याची मागणी जोर धरीत आहे. राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या मोठय़ा प्रमाणात आत्महत्या झाल्या आहेत. या भागात सिंचनाच्या सुविधेत वाढ व्हावी, यासाठी महावितरणतर्फे या भागात एकूण ७ हजार ५४0 सौरपंप देण्यात येणार आहे. या भागांशिवाय महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेला लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या जिल्हय़ातील गावातील शेतकरी, वनविभागाच्या नाहरकत प्रकारामुळे विद्युतीकरण न झालेल्या भागातील शेतकरी किंवा महावितरणकडे पैसे भरूनही ज्यांना तांत्रिक कारणांमुळे जवळच्या काळात वीज पुरवठा देणे शक्य झाले नाही, अशा शेतकर्‍यांनाही सौरपंप दिले जाणार आहे.