शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

न्यायालयाने शिक्षा ठाेठावलेल्या राज्यातील २९ लाचखाेरांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 10:54 IST

Amenity to 29 bribe takers : लाचखाेरांवर अद्यापही कारवाई झाली नसल्याने त्यांचा संबंधित विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याची माहिती आहे़

- सचिन राऊत

अकाेला : राज्यातील विविध शासकीय कामकाज करण्यासाठी लाच घेणाऱ्या तब्बल २९ लाचखाेरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने २०२१ या वर्षातील ८ महिन्यांत शिक्षा ठाेठावली. मात्र, या लाचखाेरांवर बडतर्फीची कारवाई अद्यापही झाली नसल्याचे वास्तव आहे़ न्यायालयाने शिक्षा ठाेठावल्यानंतरही त्यांचा संबंधित विभाग या लाचखाेरांना पाठीशी घालत असल्याचे वास्तव आहे़. शासकीय कार्यालयात अडलेले काम करून देण्यासाठी शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी लाच मागत असताना अटक झाल्यानंतर त्यांच्याविरुद्धचा तपास करून एसीबीने न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले़. त्यानंतर या प्रकरणाचे खटले न्यायालयात चालल्यानंतर न्यायालयाने राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या २९ लाचखाेरांना शिक्षा सुनावली आहे़ मात्र, या लाचखाेरांना त्यांचेच संबंधित विभाग पाठीशी घालत असल्याचे वास्तव आहे़. या लाचखाेरांवर संबंधित विभागाकडून अद्यापही बडतर्फीची कारवाई झाली नसल्याचे खात्रीलायक वृत्त असून, एसीबी व न्यायालयाच्या कारवाईनंतरही त्यांचा संबंधित विभाग या लाचखाेरांवर मेहेरबान असल्याचे दिसून येत आहे़. एसीबीने दिलेल्या आकडेवारीनुसार या लाचखाेरांवर अद्यापही कारवाई झाली नसल्याने त्यांचा संबंधित विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याची माहिती आहे़.

 

परिक्षेत्रनिहाय आकडेवारी

परिक्षेत्र कारवाई न झालेल्यांची संख्या

मुंबई ०१

ठाणे            ०४

पुणे             ००

नाशिक ०२

नागपूर ०८

अमरावती ०१

औरंगाबाद ०३

नांदेड            ११

एकूण            २९

 

लाचखाेरांची वर्गनिहाय संख्या

शासकीय कार्यालयात काम अडवून त्यांना विविध तांत्रिक मुद्दे सांगत काम हाेणार नसल्याचे सांगून लाच मागणाऱ्या क्लास वन अधिकाऱ्यांसह वर्ग दाेन, तीन आणि चार मध्ये काम करणाऱ्यांचा समावेश आहे़. यानुसार वर्ग एकचा एकही अधिकारी नसल्याचे वास्तव आहे, तर वर्ग दाेनचे ३ अधिकारी असून वर्ग तीनचे २३ कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़. वर्ग चारच्या २ जणांना अटक करण्यात आली असून, एका इतर लाेकसेवकास एसीबीने अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा ठाेठावली आहे़.

शासकीय कार्यालयांचा हात आखडता

शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाई केल्यानंतर त्यांच्याविरुद्धचे खटले न्यायालयात चालले़ दाेषी आढळल्यानंतर त्यांना शिक्षाही ठाेठावण्यात आली़ मात्र, या लाचखोरांवर ते कार्यरत असलेल्या संबंधित विभागाने बडतर्फीची कारवाई करण्याचा नियम असताना अशांवर अद्यापही कारवाई केलेली नसल्याचे समाेर आले आहे़ त्यामुळे लाचखाेरांवर कारवाईसाठी शासकीय कार्यालयांचा हात आखडता असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBribe Caseलाच प्रकरण