शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

प्रगत शाळांमध्ये आश्चर्यकारक वाढ!

By admin | Updated: June 7, 2017 01:57 IST

शिक्षण विभागाचा दावा: वर्षभरातच आठ हजारांवरून २४ हजारांवर शाळा प्रगत!

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सन २०१५-१६ मध्ये राज्य शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होत असल्याचा दावा राज्याच्या शिक्षण विभागाने केला असून, प्रगत शाळांच्या संख्येतही आश्चर्यकारक वाढ झाल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अहवालात दर्शविण्यात आले आहे. २०१५-१६ मध्ये राज्यात केवळ ८ हजार ७९१ शाळा प्रगत झाल्या. २०१६-१७ मध्ये यात आश्चर्यकारक वाढ होऊन तब्बल २४ हजार ६८७ शाळा प्रगत झाल्याचा दावा करण्यात आला. प्रगत शाळा करण्यासाठी शिक्षण विभागाने वर्षभरामध्ये आठ हजारांवरून २४ हजारांवर घेतलेली उडी आश्चर्यकारक आहे. २०१५-१६ मध्येच शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू करून कामाला सुरुवात केली आणि एकाच वर्षामध्ये आठ हजारांवर शाळा प्रगत केल्या. दुसऱ्याच वर्षी शिक्षण विभागाने वेगाने कामाची गती वाढवत शाळा प्रगत करण्याच्या संख्येत तिप्पट वाढ केली. एकही मूल शैक्षणिकदृष्ट्या मागे राहणार नाही. मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने अपेक्षित शैक्षणिक प्रगती केली आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील मूलभूत क्षमता व शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण घेण्यात येते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद यांच्यामार्फत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या वर्षातून तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्यात येतात. यात एक पायाभतू चाचणी व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामधील संकलित मूल्यमापनाच्या दोन चाचण्या घेण्यात येतात, तसेच शासनाकडून शिक्षकांना आवश्यकतेनुसार व मागणीनसार प्रशिक्षणसुद्धा देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी व शाळांची निरंतर प्रगती होत असून, झपाट्याने प्रगत शाळांची संख्या वाढत असल्याचा दावा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अहवालातून करण्यात आला आहे. शिक्षक तज्ज्ञांच्या मते, प्रगत शाळांमध्ये झालेली वाढ आश्चर्यकारक असून, केवळ आकडा फुगविण्यासाठी तर ही वाढ करण्यात आली नाही ना, असे बोलल्या जात आहे. पटसंख्येतही मोठी वाढएकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घसरत असताना, दुसरीकडे शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये पटसंख्या वाढत असल्याचा दावा करण्यात येत आहे. २०१४-१५ मध्ये राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ६१.८ लाख एवढी होती. त्यात वाढ होऊन २०१५-१६ मध्ये ६४.२ लाखांवर गेल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने म्हटले आहे. मुलींची पटसंख्या घसरलीशिक्षण विभागाने शिक्षणातील मुला-मुलींचे प्रवेश वाढविण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी २००९ मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत शाळांमधील मुला-मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. गतवर्षी मुलींची पटसंख्या ४५.७ होती; परंतु किंचित ही टक्केवारी घसरली असून, यंदा मुलींच्या पटसंख्या ४५.५ वर आली आहे. शाळा प्रगत करण्यावर आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती करण्यावर शासनाने भर दिला असून, शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची कडक अंमलबजावणी सुरू करून चाचण्या आणि शिक्षकांचे प्रशिक्षण याकडे अधिक लक्ष दिले आहे, त्यामुळे वर्षभरामध्ये आश्चर्यकारक बदल घडून आला आहे. एस. के. कुळकर्णी, शिक्षण उपसंचालक.