शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रगत शाळांमध्ये आश्चर्यकारक वाढ!

By admin | Updated: June 7, 2017 01:57 IST

शिक्षण विभागाचा दावा: वर्षभरातच आठ हजारांवरून २४ हजारांवर शाळा प्रगत!

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सन २०१५-१६ मध्ये राज्य शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होत असल्याचा दावा राज्याच्या शिक्षण विभागाने केला असून, प्रगत शाळांच्या संख्येतही आश्चर्यकारक वाढ झाल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अहवालात दर्शविण्यात आले आहे. २०१५-१६ मध्ये राज्यात केवळ ८ हजार ७९१ शाळा प्रगत झाल्या. २०१६-१७ मध्ये यात आश्चर्यकारक वाढ होऊन तब्बल २४ हजार ६८७ शाळा प्रगत झाल्याचा दावा करण्यात आला. प्रगत शाळा करण्यासाठी शिक्षण विभागाने वर्षभरामध्ये आठ हजारांवरून २४ हजारांवर घेतलेली उडी आश्चर्यकारक आहे. २०१५-१६ मध्येच शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू करून कामाला सुरुवात केली आणि एकाच वर्षामध्ये आठ हजारांवर शाळा प्रगत केल्या. दुसऱ्याच वर्षी शिक्षण विभागाने वेगाने कामाची गती वाढवत शाळा प्रगत करण्याच्या संख्येत तिप्पट वाढ केली. एकही मूल शैक्षणिकदृष्ट्या मागे राहणार नाही. मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने अपेक्षित शैक्षणिक प्रगती केली आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील मूलभूत क्षमता व शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण घेण्यात येते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद यांच्यामार्फत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या वर्षातून तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्यात येतात. यात एक पायाभतू चाचणी व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामधील संकलित मूल्यमापनाच्या दोन चाचण्या घेण्यात येतात, तसेच शासनाकडून शिक्षकांना आवश्यकतेनुसार व मागणीनसार प्रशिक्षणसुद्धा देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी व शाळांची निरंतर प्रगती होत असून, झपाट्याने प्रगत शाळांची संख्या वाढत असल्याचा दावा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अहवालातून करण्यात आला आहे. शिक्षक तज्ज्ञांच्या मते, प्रगत शाळांमध्ये झालेली वाढ आश्चर्यकारक असून, केवळ आकडा फुगविण्यासाठी तर ही वाढ करण्यात आली नाही ना, असे बोलल्या जात आहे. पटसंख्येतही मोठी वाढएकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घसरत असताना, दुसरीकडे शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये पटसंख्या वाढत असल्याचा दावा करण्यात येत आहे. २०१४-१५ मध्ये राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ६१.८ लाख एवढी होती. त्यात वाढ होऊन २०१५-१६ मध्ये ६४.२ लाखांवर गेल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने म्हटले आहे. मुलींची पटसंख्या घसरलीशिक्षण विभागाने शिक्षणातील मुला-मुलींचे प्रवेश वाढविण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी २००९ मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत शाळांमधील मुला-मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. गतवर्षी मुलींची पटसंख्या ४५.७ होती; परंतु किंचित ही टक्केवारी घसरली असून, यंदा मुलींच्या पटसंख्या ४५.५ वर आली आहे. शाळा प्रगत करण्यावर आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती करण्यावर शासनाने भर दिला असून, शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची कडक अंमलबजावणी सुरू करून चाचण्या आणि शिक्षकांचे प्रशिक्षण याकडे अधिक लक्ष दिले आहे, त्यामुळे वर्षभरामध्ये आश्चर्यकारक बदल घडून आला आहे. एस. के. कुळकर्णी, शिक्षण उपसंचालक.